शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नवी मुंबई, सोलापुरात एटीएसचे स्वतंत्र युनिट, गृह विभागाचा निर्णय, दहशतवादी कारवायांना लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:01 IST

राज्यातील सागरी किनारपट्टीसह सीमा भागातील शहरांमध्ये अतिरेकी संघटनांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व सोलापूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट स्थापन करण्याच्या एटीएसच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

- जमीर काझी मुंबई : राज्यातील सागरी किनारपट्टीसह सीमा भागातील शहरांमध्ये अतिरेकी संघटनांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व सोलापूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट स्थापन करण्याच्या एटीएसच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. आठवडाभरात त्याबाबतची कार्यवाही होईल. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० हून अधिक अधिकारी-कर्मचारी असतील.नवी मुंबई व सोलापुरातील स्वतंत्र कक्षामुळे स्थानिक पोलीस तसेच अनुक्रमे ठाणे व पुण्याच्या एटीएसवर पडणारा अतिरिक्त भार कमी होणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील संशयास्पद व्यक्ती, वस्तंूबाबत तत्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईबरोबरच कोकण व मराठवाडा, सीमाभागात संशयास्पद व्यक्तींचा वावर, हालचाली वाढल्या आहेत. घातपाती कृत्यांची शक्यता पाहता, हा परिसर संवेदनशील बनल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एटीएसला स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाळत ठेवावी लागत होती. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राच्या सीमेवरील सोलापुरात एटीएसचे स्वतंत्र युनिट सुरू केल्यास आंध्र प्रदेश व कर्नाटकाच्या सीमा भागातील हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील सागरी किनारा व औद्योगिक क्षेत्र तसेच उरण, रायगड या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र युनिटची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव एटीएसचे प्रमुख अतुलचंंद्र कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी गृह विभागाला पाठविला होता. त्याला गृह विभागाने मान्यता दिली आहे. स्थानिक पोलिसांकडून हे मनुष्यबळ या कक्षासाठी वर्ग केले जातील. नवी मुंबईतील स्वतंत्र युनिटमुळे ठाणे एटीएसला मुंब्रा, कळवा, पालघर आदी भागात अधिक लक्ष केंद्रित करून तेथील घातपाती कृत्याला लगाम घालता येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कार्यालयांची संख्या आठमुख्यालयाशिवाय महाराष्ट्र एटीएसची सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, अकोला या ठिकाणी कार्यालये आहेत. आता नवी मुंबई व सोलापूरमुळे कार्यालयांची संख्या आठवर गेली आहे. मुंबई, औरंगाबाद व पुणे शाखेचे कामकाज उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखाली तर अन्य ठिकाणी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम चालते.

टॅग्स :PoliceपोलिसTerrorismदहशतवाद