शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

नवी मुंबई, सोलापुरात एटीएसचे स्वतंत्र युनिट, गृह विभागाचा निर्णय, दहशतवादी कारवायांना लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:01 IST

राज्यातील सागरी किनारपट्टीसह सीमा भागातील शहरांमध्ये अतिरेकी संघटनांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व सोलापूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट स्थापन करण्याच्या एटीएसच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

- जमीर काझी मुंबई : राज्यातील सागरी किनारपट्टीसह सीमा भागातील शहरांमध्ये अतिरेकी संघटनांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व सोलापूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट स्थापन करण्याच्या एटीएसच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. आठवडाभरात त्याबाबतची कार्यवाही होईल. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० हून अधिक अधिकारी-कर्मचारी असतील.नवी मुंबई व सोलापुरातील स्वतंत्र कक्षामुळे स्थानिक पोलीस तसेच अनुक्रमे ठाणे व पुण्याच्या एटीएसवर पडणारा अतिरिक्त भार कमी होणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील संशयास्पद व्यक्ती, वस्तंूबाबत तत्काळ कार्यवाही करणे शक्य होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईबरोबरच कोकण व मराठवाडा, सीमाभागात संशयास्पद व्यक्तींचा वावर, हालचाली वाढल्या आहेत. घातपाती कृत्यांची शक्यता पाहता, हा परिसर संवेदनशील बनल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एटीएसला स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाळत ठेवावी लागत होती. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राच्या सीमेवरील सोलापुरात एटीएसचे स्वतंत्र युनिट सुरू केल्यास आंध्र प्रदेश व कर्नाटकाच्या सीमा भागातील हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील सागरी किनारा व औद्योगिक क्षेत्र तसेच उरण, रायगड या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र युनिटची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव एटीएसचे प्रमुख अतुलचंंद्र कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी गृह विभागाला पाठविला होता. त्याला गृह विभागाने मान्यता दिली आहे. स्थानिक पोलिसांकडून हे मनुष्यबळ या कक्षासाठी वर्ग केले जातील. नवी मुंबईतील स्वतंत्र युनिटमुळे ठाणे एटीएसला मुंब्रा, कळवा, पालघर आदी भागात अधिक लक्ष केंद्रित करून तेथील घातपाती कृत्याला लगाम घालता येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कार्यालयांची संख्या आठमुख्यालयाशिवाय महाराष्ट्र एटीएसची सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, अकोला या ठिकाणी कार्यालये आहेत. आता नवी मुंबई व सोलापूरमुळे कार्यालयांची संख्या आठवर गेली आहे. मुंबई, औरंगाबाद व पुणे शाखेचे कामकाज उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखाली तर अन्य ठिकाणी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम चालते.

टॅग्स :PoliceपोलिसTerrorismदहशतवाद