शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

खवळलेल्या समुद्राशी नौदलाची झुंज

By admin | Updated: September 19, 2016 06:04 IST

मुंबईजवळ समुद्रात बुडालेल्या मच्छीमार बोटीवरील १७ पैकी १४ मच्छीमारांना वाचविण्यात शनिवारी सायंकाळी बचाव पथकांना यश आले.

मुंबई : मुंबईजवळ समुद्रात बुडालेल्या मच्छीमार बोटीवरील १७ पैकी १४ मच्छीमारांना वाचविण्यात शनिवारी सायंकाळी बचाव पथकांना यश आले. या बेपत्ता मच्छीमारांच्या शोधासाठी समुद्रात उतरलेले नौदलाचे दोन पाणबुडे (डायव्हर्स) दिसेनासे झाल्याने नौदलाच्या चिंतेत भर पडली होती. अखेर रविवारी सकाळी या दोन्ही पाणबुड्यांचा शोध लागला आणि त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, खवळलेला समुद्र, मुसळधार पाऊस, अंधार आणि खराब हवामानाशी या जवानांनी रात्रभर यशस्वी झुंज दिली. मुंबईपासून ३० सागरी मैल अंतरावर शनिवारी सकाळी दत्त साई ही बोट खराब हवामानामुळे बुडाली. याच परिसरात असलेल्या एमव्ही डीपेंडेबल या बोटीने तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त मच्छीमार बोटीवरील १४ मच्छीमारांची सुटका केली. तर, बेपत्ता मच्छीमारांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दल आणि ओएनजीसीच्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवली. शोधकार्यादरम्यान शनिवारी सायंकाळी नौदलाच्या आयएनएस त्रिशूलवरील जवानांना समुद्रात एक मच्छीमार वाहून जात असल्याचे आढळले. या मच्छीमाराला वाचविण्यासाठी आयएनएस त्रिशूलवरील बिपीन दहल आणि घनश्याम पाटीदार हे दोन पाणबुडे (डायव्हर्स) समुद्रात उतरले.अपघात आणि खराब हवामानामुळे भेदरलेला मच्छीमार बचावासाठी आलेल्या जवानांपर्यंत पोहचू शकला नाही. अवघ्या तीन मीटरवर असूनही खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारापर्यंत पोहचणे शक्य होत नव्हते. या प्रयत्नात मच्छीमारासह पाणबुडेदेखील समुद्रात दिसेनासे झाले. त्यामुळे बेपत्ता मच्छीमारांसह पाणबुड्यांच्या शोधासाठी दहा बोटी आणि चार हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने बचाव पथकांनी जोरदार मोहीम हाती घेतली. रविवारी सकाळी ६च्या सुमारास शोधपथकांना दोन्ही पाणबुड्यांचा शोध घेण्यात यश आले. प्रतिकूल परिस्थितीतही या दोघा जवानांनी समुद्रात संपूर्ण रात्र काढली. तब्बल बारा तासांहून अधिक काळ या जवानांनी समुद्राशी यशस्वी झुंज तर दिलीच; शिवाय या कालावधीत एकमेकांच्या सहकार्याने बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या पाणबुड्यांना मुंबई नौदलाच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी या जवानांची रुग्णालयात भेट घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही देशबांधवांच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून नेटाने प्रयत्न करून या जवानांनी नौदलाच्या उच्च परंपरेचा वारसा पुढे चालविल्याबद्दल लुथरा यांनी जवानांचे कौतुक केल्याचे जनसंपर्क अधिकारी कॅप्टन राहुल सिन्हा यांनी सांगितले. >तीन जण बेपत्ताएमव्ही डीपेंडेबल या बोटीने तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त मच्छीमार बोटीवरील १४ मच्छीमारांची सुटका केली. तर, बेपत्ता मच्छीमारांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.