शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले

By admin | Updated: September 9, 2014 05:07 IST

सामाजिक एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोत्सवाचे स्वरुप यावेळी मोठय़ा प्रमाणात बदलल्याचे चित्र पश्‍चिम वर्‍हाडात दिसून आले

संतोष मुंढे, वाशिम - सामाजिक एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोत्सवाचे स्वरुप यावेळी मोठय़ा प्रमाणात बदलल्याचे चित्र पश्‍चिम वर्‍हाडात दिसून आले. गत १0 दिवसांमध्ये या भागातील तिन्ही जिल्ह्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून, गणेशोत्सव अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.लोकमान्य टिळकांनी जनजागृती, प्रबोधन करणे, तसेच सामाजिक एकोपा वाढून स्वातंत्र्यलढय़ाची चळवळ घराघरांत पोहोचविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना अस्तित्वात आणली. कालांतराने या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. सार्वजनिक गणेश मंडळं सामाजिक उपक्रमांबरोबरच धार्मिक कार्यक्रमांवर भर देऊ लागले. यावेळीही मंडळांनी तीच परंपरा जोपासली. रक्तदान, नेत्रतपासणी शिबिर आदी आरोग्यविषयक उपक्रमांसह काही ठिकाणी समाजातील कुप्रथा, समस्यांबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न गणेश मंडळांनी केले. एड्स आणि स्त्रीभ्रूण हत्येबाबत जनजागृती करण्यात आली. तद्वतच, प्रवचन, कीर्तन, सामूहिक गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही गणेश मंडळांच्या वतीने करण्यात आले. वाशिम शहरातील एकूण गणेश मंडळांपैकी ७५ टक्के गणेश मंडळांच्यावतीने सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेण्यात आला. ५ टक्के गणेश मंडळांनी मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले, तर २५ टक्के गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेश स्थापना केली. गणेश मंडळांनी अवाजवी खर्चाला यावेळी फाटा दिल्याचे चित्रही दिसून आले. बुलडाणा जिल्ह्यातील एकूण ८८१ सार्वजनीक गणेश मंडळांपैकी ८२ टक्के गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले. शिक्षण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान आणि गरजवंतांना मदत करण्यासह, वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेवर भर देण्याचे काम या जिल्ह्यातील मंडळांनी केले. गतीमंद बालकांचे शैक्षणीक पालकत्व स्विकारून बुलडाण्यातील रुद्र गणेश मंडळाने पश्‍चिम वर्‍हाडातील सर्व मंडळांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. अकोला जिल्ह्यातील एकूण १७८४ गणेश मंडळांनी विविध मुद्यांवर फलकं व देखावे सादर करुन जनप्रबोधनाचे काम केले. पश्‍चिम वर्‍हाडात सर्वाधिक ३२४ गावांमध्ये एक गाव एक गणपती बसविण्याचा विक्रम अकोला जिल्ह्याने आपल्या नावे केला आहे. १३ तालुक्याच्या बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी ८८१ सार्वजनीक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली. या जिल्ह्यातील २९२ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली. ६ तालुक्यांच्या वाशिम जिल्ह्यात ६0५ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. यामध्ये शहरी भागातील २१९ तर ग्रामीण भागातील ३८६ गणेश मंडळांचा समावेश होता. ७ तालुक्याच्या अकोला जिल्ह्यात १७८४ सार्वजनीक गणेश मंडळानी श्रींची स्थापना केल्याची नोंद आहे. यामध्ये ३२४ गावात एक गाव एक गणपतीची नोंद करण्यात आली. १0 दिवसांच्या या उत्सवात तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. गुण्यागोविंदाने एवढा मोठा उत्सव साजरा करून, पश्‍चिम वर्‍हाडाने सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे.