शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड; डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 06:39 IST

‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशा रंगभूमी तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते.

पुणे : ‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त विनवणी करीत रसिकांचे हृदय आपल्या अभिनयातून हेलावून टाकणारा रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेला. ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशा रंगभूमी तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्याने नाट्य आणि चित्रपट क्षेत्राला धक्का बसला.

डॉ. लागू यांच्या पश्चात पत्नी दीपा लागू आणि मुलगा आनंद लागू तसेच चुलत भाऊ उदय लागू असा परिवार आहे. मुलगा अमेरिकेमध्ये असतो. श्रीराम बाळकृष्ण लागू यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण मात्र पुण्यात झाले. शाळेसाठी त्यांनी भावे स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काही वर्षे शिक्षण घेतल्यावर डॉक्टर बनण्यासाठी ते बी.जे. मेडिकल महाविद्यालयामध्ये गेले. शिक्षण सुरू असतानाच भालबा केळकर यांच्या 'प्रोग्रेसिव्ह मॅटिक असोसिएशन'मधून त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी प्र.के. अत्रे यांच्या 'उद्याचा संसार' या नाटकात भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. सतत बारा-तेरा वर्षे ते भालबांच्या हाताखाली ‘बेबंदशाही', 'रथ जगन्नाथाचा', 'वेड्याचं घर उन्हात' अशा अनेक नाटकात भूमिका करीत राहिले. १९६४ साली विजय तेंडुलकर यांच्या 'मी जिंकलो, मी हरलो'या नाटकात त्यांनी भूमिका केली. विजया मेहता यांनी 'रंगायन' या संस्थेने ते नाटक सादर केले होते. त्या संस्थेत दोन वर्षे काम केल्यावर थिएटर युनिटमध्ये त्यांनी 'आधे अधुरे' व 'ययाती' ही नाटके केली.

'गिधाडे' या नाटकाच्या वेळी त्यांची दीपा बसरूर या अभिनेत्रीशी जवळीक निर्माण झाली व २४ जुलै १९७१ रोजी दीपा बसरूर दीपा लागू झाल्या. या दोघांनी 'रूपवेध' या संस्थेची स्थापना केली व १९७४ ते १९८९ या काळात चार नाटके सादर केली. त्यानंतर त्यांनी १९७४ व १९९५ साली 'प्रतिमा' व 'क्षितिजापर्यंत समुद्र' ही दोन नाटके रंगमंचावर आणली. पण हा सारा नाट्यसंसार प्रायोगिक रंगभूमीवरील वाटचालीचा होता. प्रायोगिक रंगभूमीबरोबरच त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही अनेक भूमिका केल्या. 'इथे ओशाळला मृत्यू'पासून त्याची सुरुवात झाली. त्यांनी १९६९ साली ते नाटक सादर केले. त्यानंतर 'वेड्याचं घर उन्हात'. 'गिधाडे'. 'काचेचा चंद्र', 'नटसम्राट'. 'हिमालयाची सावली' अशी अनेक नाटकांतून भूमिका करून डॉ. लागूंनी मराठी रंगभूमीवर स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले.

मराठी चित्रपट आणि रंगभूमी गाजविल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतही डॉ. श्रीराम लागू यांनी आपली छाप उमटविली. व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरच्या भूमिकेद्वारे त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. १९७२ मधील या चित्रपटात त्यांनी वठवलेली शिक्षक ते तमाशाचा फडावरचा एक उपरा पुरुष ही प्रवाही भूमिका लक्षणीय आहे, याचा प्रत्यय आजच्या चित्रपट रसिकांनाही येतो. 'पिंजरा'पाठोपाठ 'सामना', 'सिंहासन', 'सुगंधी कट्टा, 'मुक्ता', 'देवकीनंदन गोपाळा', 'झाकोळ', 'कस्तुरी, 'सोबती', 'पांढरं', 'मसाला' वगैरे चित्रपटांत त्यांनी साकार केलेल्या भूमिका त्यांच्या अभिनयामुळे लक्षात राहिल्या आहेत. 'घरोंदा', 'किनारा', 'इमान धरम', 'एक दिन अचानक' वगैरे हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका म्मरणीय होत्या. डॉ. लागू यांनी 'गिधाडे', 'नटसम्राट', 'किरवंत' वगैरे काही नाटके दिग्दर्शित केली, तर झाकोळ' (१९८०) या एकमेव मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. १९५१ पासून सुरू झालेल्या नाट्य व चित्रपट कारकिर्दीमध्ये जवळजवळ पन्नास वर्षात डॉ. लागू यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारत सरकारतर्फे १९७४ साली 'पद्मश्री', महाराष्ट्र शासनातर्फे 'जीवनगौरव' पुरस्कार, २००० साली 'पुण्यभूषण', त्यामध्ये 'संगीत नाटक अकादमी' आदी पुरस्कारांचा समावेश आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांना 'सुगंधी कट्टा'. 'सायना' व 'भिंगरी' या चित्रपटांतील अभिनयासाठी 'फिल्मफेअर' पारितोषिकांनी गौरवले होते. 'घरोंदा' या हिंदी चित्रपटासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

चित्रपटसृष्टीतून स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारून डॉ. लागू मुंबईहून पुण्याला आले व तेथे निवृत्तीचे जीवन जगत होते. परंतु, पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. डॉ लागू यांना दीनानाथ रुग्णालयात काल रात्री 8. 30च्या दरम्यान भरती करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ धनंजय केळकर यांनी दिली. 

अमेरिकेहून त्यांचा मुलगा येणार असल्याने डॉ श्रीराम लागू यांचे पार्थिव गुरुवार दि. 19 रोजी अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागू