शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

National Inter Religious Conference: सेक्युलर शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्षता’ नव्हे तर सर्वधर्म समभाव’ - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 14:11 IST

Nitin Gadkari Speech in National Inter-Religious Conference: आजचा दिवस नागपूरच्या इतिहासातील खास दिवस आहे. विजय दर्डा यांनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लोकमतच्या कार्यक्रमाचं कौतुक केले.

ठळक मुद्देपवित्र नद्यांचा संगम होतो तसा या कार्यक्रमानिमित्त सर्व विचारांचा संगम इथं झालंउपासना पद्धती वेगळ्या असली तरी भावार्थ आणि आपलेपणा एक आहे. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख भारत विश्वगुरू बनण्याची ताकद ठेवतो. भारतीय संस्कृती सर्व धर्मापासून मिळालेल्या मुल्यावर आधारित आहे

नागपूर - सर्व धर्म, सांप्रदायाचा सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्म समभाव आहे. धर्मनिरपेक्षता नाही. सर्वांचा सन्मान करणं हा जीवनाचा दृष्टीकोन आहे. धर्म शब्दाबाबत आपल्याकडे गोंधळ आहे. कुणी म्हणतं मी पत्रकारिता धर्माचं पालन करतो, कुणी म्हणतं मी शिक्षिकी धर्मांचं पालन करतो मग हे धर्म कोणते? कर्तव्य करणं हे धर्म आहे. भारतात विविधता असली तरी आपला राष्ट्रधर्म एक आहे. आपल्या संत-महात्मांनी जे मार्गदर्शन केले ते मुल्याशी निगडीत आहे असे स्पष्ट विचार केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी मांडले.

लोकमत वृत्तपत्राच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त नागपूर येथे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हानं आणि भारताची भूमिका या विषयावर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, आजचा दिवस नागपूरच्या इतिहासातील खास दिवस आहे. विजय दर्डा यांनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली. सर्व धर्मातील प्रमुख लोकांना एकत्र आणत लोकप्रबोधन करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल कौतुक आहे. विशेष म्हणजे हे सभागृह बांधताना सभागृहाची संपूर्ण लाईट सोलारवर ठेवली होती हे वैशिष्ट आहे. त्या सभागृहात कार्यक्रम होतोय याचा आनंद आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच आज खऱ्या अर्थाने खूप चांगले मार्गदर्शन झाले. मी अनेकदा वामनराव पै यांच्याकडे गेलो. त्यांच्या प्रार्थनेत सगळं काही आलं. विश्वाचं  कल्याण कर असं प्रार्थनेत म्हटलं आहे. फक्त भारतीयांचे कल्याण कर असं म्हटलं नाही.  माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे. माझा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आलो नाही. कुठल्याही देवाची पूजा केली तर त्याची श्रद्धा एकाच ईश्वराला मिळते. सर्वांनी एक विचार कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवले. आमचे विचार, धर्म, सांप्रदाय वेगवेगळे असू शकतात परंतु सहिष्णुता हेदेखील एक मुल्य आहेत. सर्व गोष्टीचं अध्ययन करून जीवन समृद्ध करण्याचा मार्ग शोधायला हवा असं नितीन गडकरींनी सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमाची कल्पना खूप चांगली आहे. उपासना पद्धती वेगळ्या असली तरी भावार्थ आणि आपलेपणा एक आहे. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. त्यामुळे भारत विश्वगुरू बनण्याची ताकद ठेवतो. भारतीय संस्कृती सर्व धर्मापासून मिळालेल्या मुल्यावर आधारित आहे. त्याचआधारे शिक्षण पद्धती सुरु आहे. याच संस्काराने भारताची पुढील पिढी घडत आहे. पवित्र नद्यांचा संगम होतो तसा या कार्यक्रमानिमित्त सर्व विचारांचा संगम इथं झालं. जीवनात चांगले कार्य, राष्ट्रकार्य करण्याची शक्ती सर्व धर्मगुरुंकडून मिळो हीच अपेक्षा असल्याचा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.

आणखी वाचा

...म्हणून मला नितीन गडकरींचे 'वजन' कमी करायचेय; रामदेव बाबांनी केली स्तुती

"दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे, येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो"

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदNitin Gadkariनितीन गडकरी