शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

National Inter Religious Conference: सेक्युलर शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्षता’ नव्हे तर सर्वधर्म समभाव’ - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 14:11 IST

Nitin Gadkari Speech in National Inter-Religious Conference: आजचा दिवस नागपूरच्या इतिहासातील खास दिवस आहे. विजय दर्डा यांनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लोकमतच्या कार्यक्रमाचं कौतुक केले.

ठळक मुद्देपवित्र नद्यांचा संगम होतो तसा या कार्यक्रमानिमित्त सर्व विचारांचा संगम इथं झालंउपासना पद्धती वेगळ्या असली तरी भावार्थ आणि आपलेपणा एक आहे. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख भारत विश्वगुरू बनण्याची ताकद ठेवतो. भारतीय संस्कृती सर्व धर्मापासून मिळालेल्या मुल्यावर आधारित आहे

नागपूर - सर्व धर्म, सांप्रदायाचा सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ सर्वधर्म समभाव आहे. धर्मनिरपेक्षता नाही. सर्वांचा सन्मान करणं हा जीवनाचा दृष्टीकोन आहे. धर्म शब्दाबाबत आपल्याकडे गोंधळ आहे. कुणी म्हणतं मी पत्रकारिता धर्माचं पालन करतो, कुणी म्हणतं मी शिक्षिकी धर्मांचं पालन करतो मग हे धर्म कोणते? कर्तव्य करणं हे धर्म आहे. भारतात विविधता असली तरी आपला राष्ट्रधर्म एक आहे. आपल्या संत-महात्मांनी जे मार्गदर्शन केले ते मुल्याशी निगडीत आहे असे स्पष्ट विचार केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी मांडले.

लोकमत वृत्तपत्राच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त नागपूर येथे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हानं आणि भारताची भूमिका या विषयावर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, आजचा दिवस नागपूरच्या इतिहासातील खास दिवस आहे. विजय दर्डा यांनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली. सर्व धर्मातील प्रमुख लोकांना एकत्र आणत लोकप्रबोधन करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल कौतुक आहे. विशेष म्हणजे हे सभागृह बांधताना सभागृहाची संपूर्ण लाईट सोलारवर ठेवली होती हे वैशिष्ट आहे. त्या सभागृहात कार्यक्रम होतोय याचा आनंद आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच आज खऱ्या अर्थाने खूप चांगले मार्गदर्शन झाले. मी अनेकदा वामनराव पै यांच्याकडे गेलो. त्यांच्या प्रार्थनेत सगळं काही आलं. विश्वाचं  कल्याण कर असं प्रार्थनेत म्हटलं आहे. फक्त भारतीयांचे कल्याण कर असं म्हटलं नाही.  माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे. माझा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आलो नाही. कुठल्याही देवाची पूजा केली तर त्याची श्रद्धा एकाच ईश्वराला मिळते. सर्वांनी एक विचार कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवले. आमचे विचार, धर्म, सांप्रदाय वेगवेगळे असू शकतात परंतु सहिष्णुता हेदेखील एक मुल्य आहेत. सर्व गोष्टीचं अध्ययन करून जीवन समृद्ध करण्याचा मार्ग शोधायला हवा असं नितीन गडकरींनी सांगितले.

दरम्यान, या कार्यक्रमाची कल्पना खूप चांगली आहे. उपासना पद्धती वेगळ्या असली तरी भावार्थ आणि आपलेपणा एक आहे. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे. त्यामुळे भारत विश्वगुरू बनण्याची ताकद ठेवतो. भारतीय संस्कृती सर्व धर्मापासून मिळालेल्या मुल्यावर आधारित आहे. त्याचआधारे शिक्षण पद्धती सुरु आहे. याच संस्काराने भारताची पुढील पिढी घडत आहे. पवित्र नद्यांचा संगम होतो तसा या कार्यक्रमानिमित्त सर्व विचारांचा संगम इथं झालं. जीवनात चांगले कार्य, राष्ट्रकार्य करण्याची शक्ती सर्व धर्मगुरुंकडून मिळो हीच अपेक्षा असल्याचा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.

आणखी वाचा

...म्हणून मला नितीन गडकरींचे 'वजन' कमी करायचेय; रामदेव बाबांनी केली स्तुती

"दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे, येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो"

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदNitin Gadkariनितीन गडकरी