शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

काँग्रेसमधून अनेक जण राजीनामा देणार होते, पण...; सत्यजित तांबेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 18:05 IST

सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. डॉ. तांबेची निवडणूक आल्यावर सगळेच एकत्रित येतात असं सत्यजित तांबे म्हणाले.

अहमदनगर - बाळासाहेब साळुंखे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरे तर महाराष्ट्रात अनेक पदाधिकारी राजीनामा देणार होते. मी प्रत्येकाला सांगितले कुणीही राजीनामा देण्याचं आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपापलं काम करा. आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. मागील १०० वर्ष कुटुंबावर आणि काँग्रेस पक्षासोबत काम केलेय. त्यामुळे कुठेही काहीही निर्णय घेता कामा नये. राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील. जेव्हा वेळ येईल तेव्हा सविस्तर यावर विषयावर बोलूच असा निरोप राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना दिला असा दावा नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला आहे. 

सत्यजित तांबे म्हणाले की, सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. डॉ. तांबेची निवडणूक आल्यावर सगळेच एकत्रित येतात. आम्ही आणि आमच्या कुटुंबाने कधीही पक्षीय, जातीय आणि धार्मिक भेद पाहिले नाहीत. जो येईल त्या माणसाची मदत करण्याची भूमिका कुटुंबाने घेतली. सगळे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेत. २२ वर्ष संघटनेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक जीवनात काम करतोय. २००० साली NSUI च्या माध्यमातून मी पक्षीय राजकारणाला सुरूवात केली. राज्याचा युवक अध्यक्ष म्हणून काम केले. मी देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या कामासाठी गेलो असेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याचं काम करत आलोय. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे कडवट कार्यकर्ते होते त्यांचे विचार होते नवी पिढी पुढे यायला हवी. मोठ्या व्यासपीठावर हे काम मांडण्याची गरज आहे. त्यातून या निवडणुकीत उभा राहिलो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सर्व शिक्षक संघटनांचे आभार ज्यांनी माझ्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या ७-८ दिवसांपासून जे राजकारण सुरू आहे त्यातून सगळ्यांनी तांबे कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला त्याचे आभार आहोत. हा मतदारसंघ छोटा नाही. अहिल्याबाईंचे जन्मगाव असल्यापासून गुजरात, मध्य प्रदेशाच्या बोर्डरपर्यंत हा मतदारसंघ आहे. ४ हजार गावे आहेत. या भव्य मतदारसंघात गेल्या १४ वर्षापासून सुधीर तांबे यांनी जनसंपर्क ठेवला. इतके मोठे काम कुठल्याच लोकप्रतिनिधींनी केले नसेल जितके सुधीर तांबे यांनी केले. सर्वात जास्त फिरणारे आमदार म्हणून सुधीर तांबेंचा उल्लेख होतो. दिवसाला ४०० किमीचा प्रवास केला. प्रत्येक दुर्मिळ भागात सुविधा पोहचवण्याचं काम सुधीर तांबे यांनी केले असंही सत्यजित तांबेंनी म्हटलं. 

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेस