शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“माझ्याकडे प्रकरण येऊ द्या, १६ आमदार अपात्र होतील”; नरहरी झिरवळ थेटच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 19:23 IST

Narhari Zirwal: मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? असा उलटप्रश्न नरहरी झिरवळ यांनी केला आहे.

Narhari Zirwal: आगामी काहीस दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत निकाल येऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. महाविकास आघाडी आणि भाजप तसेच शिंदे गटासह अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. निकाल लवकरच लागेल, अशी शक्यता वर्तवली जात असताना, यासंदर्भात प्रतिक्रिया येत असून, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट शब्दांत थेट भाष्य केले आहे. झिरवळ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांना तुमच्याकडे आमदारांचे प्रकरण आल्यावर काय करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन. न्यायालयातील निकाल विरोधात लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असे होईल. मात्र, मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? असा प्रतिप्रश्न केला. तसेच मी दिलेला निर्णय बरोबर आहे, असे नमूद केले. 

स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही

तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? असे नरहरी झरवळ यांना विचारण्यात आले. त्यावर, मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो. पण त्यासाठी संख्याबळ हवे ना. माझे कधीच होर्डिंग्ज लागणार नाहीत. लागले तर तुमचे आशीर्वाद पक्के असे समजायचे. स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही. खुर्ची रिकामी नाही. पण सत्ता संघर्षावर लोकांचा तर्कवितर्क आहे. जर तरचा प्रश्न आहे. त्याला काही अर्थ नाही, असे झिरवळ यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, केंद्रात उत्तर दायित्व आहे की नाही, अशी शंका येणे साहजिक आहे. पण सुप्रियाताई आहेच, त्यामुळे शंका घेण्याचे काम नाही. अजितदादा भाजपमध्ये जाणार असल्याची एक ते दीड महिन्यांपासून चर्चा आहे. आम्ही गेलो तर दादा जातील ना. पण आम्हालाच काही माहीत नाही. त्यामुळे अशा चर्चांना काहीच अर्थ नाही, या चर्चांचा आणि शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याचा काही संबंध नाही, असा दावाही झिरवळ यांनी केला. 

 

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळMahavikas Aghadiमहाविकास आघाडी