शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

नर्गिस, नोबेल अन् महाराष्ट्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 12:24 IST

मुद्द्याची गोष्ट : महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या इराणी कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेसाठीचे ‘नोबेल’ जाहीर झाले. त्यांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. त्यांनी ज्या प्रकारे मानवाधिकारासाठी काम केले त्याचा हा सन्मान आहे... असेच काही काम गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातही होत आहे. 

उदय कुलकर्णी, ज्येष्ठ मुक्त पत्रकार 

सगळं जग नव्यानं धर्मांधतेकडे आणि उजवीकडे कलू लागले आहे. याची चर्चा सुरू असतानाच शांततेसाठीचे ‘नोबेल’ पारितोषिक इराणमध्ये कैदेत असलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाले. ‘ नोबेल ’ पारितोषिकाच्या ११२ वर्षांच्या इतिहासात शांततेसाठी ‘ नोबेल ’ पारितोषिक मिळणाऱ्या महिलांची संख्या केवळ १९ इतकी आहे. यातील दोन महिला इराणच्या आहेत, हे विशेष !

इराणमधील मानवाधिकार कार्यकर्त्या शिरीन इबादी यांना हाच पुरस्कार २००३ साली प्रदान करण्यात आला होता. इबादी यांनी ‘ डिफेन्डर्स ऑफ ह्यूमन राईटस् सेंटर ’ नावाच्या मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या केंद्राची स्थापना केली होती. एकविसावे शतक सुरू असताना इराणसारख्या देशात मानवाधिकारांसाठी झगडणाऱ्या महिलांच्या या केंद्रावर बंदी घालण्यात आली. जेव्हा या केंद्रावर बंदी घातली गेली तेव्हा नर्गिस मोहम्मदी या केंद्राच्या उपाध्यक्षा होत्या. केवळ केस मोकळे सोडून वावरते म्हणून २२ वर्षांच्या महसा अमिनी हिला इराणमध्ये तथाकथित संस्कृती रक्षकांनी आपले लक्ष्य बनवले. संस्कृती रक्षकांच्या ताब्यात असतानाच तिचे प्राण गेले. 

यानंतर इराणमध्ये जो जनक्षोभ उसळला त्याला जबाबदार धरून नर्गिस मोहम्मदी यांना तुरुंगात डांबण्यात आले. अर्थात, तुरुंगवास ही गोष्ट नर्गिस यांच्यासाठी नवीन नव्हती. ५१ वर्षांच्या आयुष्यात १३ वेळा नर्गिस यांना वेगवेगळ्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि आयुष्यातील ३१ वर्षे त्यांनी तुरुंगवासात काढली आहेत. तुरुंगातही त्यांनी महिला कैद्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या व्यथांविषयी लिहिले आणि जगासमोर मांडलेही. हिजाबसारख्या गोष्टींच्या सक्तीपासून फाशीच्या शिक्षेपर्यंत मानवाधिकारांना ज्या ज्या गोष्टींनी बाधा पोहोचते अशा गोष्टींविरोधात जगभरात ज्या ज्या ठिकाणी उठाव होत आहे त्यातील सर्वच लढवय्यांना नर्गिस यांनाच ‘ नोबेल ’ पुरस्कार देण्याच्या निर्णयाने बळ मिळाले आहे.

वस्तुस्थिती हीच आहे की, एकविसाव्या शतकातील दुसरे दशक उलटले असलं तरी ‘मानसा, मानसा, कधी व्हशील मानूस ?’ हा बहिणाबाईंनी उपस्थित केलेला प्रश्न वारंवार विचारावा लागत आहे.

आयुष्य पणाला लावले अशांचीही आठवणमहाराष्ट्रापुरता विचार करायचा तर नर्गिस यांचे नाव ‘ नोबेल ’ पुरस्कारासाठी जाहीर झाल्यानंतर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर अशा नावांचे स्मरण तर झालेच, पण मुस्लीम समाजात सुधारणांची पाऊलवाट निर्माण करण्यासाठी ज्यांनी आयुष्य पणाला लावले अशा अनेकांचीही आठवण झाल्याखेरीज राहिली नाही. हमीद दलवाईंचे आयुष्य अवघे ४४ वर्षांचे. १९३२ साली जन्मलेल्या हमीद यांनी १९७० साली मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. 

शरीयतसारखा कायदा आणि तिहेरी तलाक पद्धती या बाबी मुस्लीम महिलांच्या मानवाधिकारांची पायमल्ली करणाऱ्या आहेत, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणाने घेतली. त्यांनी घेतलेल्या काही मेळाव्यांमधून तलाक पीडित महिलांनी आपल्या व्यथा-वेदना मांडायला सुरुवात केली. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड हे दलवाईंच्या सुधारणांच्या प्रयत्नांना उत्तर म्हणूनच निर्माण झाले.

हमीद यांचं १९७७ साली निधन झालं. पण, सय्यदभाई, बाबूमियाँ बॅन्डवाले, हमीद यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई, कोल्हापुरातील हुसेन जमादार, निपाणी परिसरातील आय.एन. बेग अशा अनेक सहकाऱ्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचं काम पुढं सुरू ठेवलं. 

माणूस हा आधी माणूस -  संघर्ष अजून थांबलेला नाही. दडपशाहीनं मानवाधिकारांसाठीचा संघर्ष जगातील कोणालाच कायमचा दडपता आलेला नाही. -  धर्म कोणताही असो, माणूस हा आधी माणूस आहे, मानव धर्मापेक्षा कोणताही धर्म मोठा असू शकत नाही, हे सर्वांनी समजून घ्यावं हे चांगलं! 

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारMaharashtraमहाराष्ट्र