शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

महायुती सरकारची राज्यात गेलेली पत सुधारण्यासाठीच मोदींचे दौरे, विजय वडेट्टीवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 16:32 IST

Narendra Modi : महायुती सरकार राज्यात सर्व आघाड्यांवर अपयशी झाले आहे.त्यामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींना वारंवार राज्यात दौरा करावा लागत असल्याची टीका  विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

नागपूर - महायुती सरकार राज्यात सर्व आघाड्यांवर अपयशी झाले आहे.त्यामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींना वारंवार राज्यात दौरा करावा लागत असल्याची टीका  विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात महायुती सरकारची कामगिरी वादग्रस्त, भ्रष्टाचाराने बरबटलेली व स्वहितासाठी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचे लक्ष राज्याच्या विकासाकडे नाही तर स्वतःचे खिसे भरण्याकडे आहे. म्हणूनच सरकारची गेलेली पत सुधारण्यासाठी मोदींना वारंवार राज्यात दौरा करावा लागत आहे.दुर्गम गडचिरोलीत काँग्रेसची विभागीय बैठक घेण्यात यावी असा विचार मांडला त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली त्यानुसार गडचिरोलीत वीस तारखेला विभागीय मेळावा होत आहे. हा मेळावा कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

१६ वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही.  या मुद्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात आणि देशात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जात नाहीत त्यामुळे आधीच अनेकजण बेरोजगार झाले आहेत. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले बेरोजगार कोचिंग क्लासेस घेऊन आपलं कुटुंब चालवतात मात्र या निर्णयामुळे बेरोजगारांना रस्त्यावर भिक मागत ठेवण्याचा हेतू दिसतो.हे सरकार बेरोजगारांना भिकेला लावत असून यातून  केंद्राची शिक्षणाप्रती अनास्था दिसून येते असे वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार