शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

काळा पैसा नरेंद्र मोदींनी स्वतः पांढरा केला, राहुल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 21:23 IST

मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देते, भाजपाने अशी फक्त खोटी आश्वासने दिली. काळा पैसा मोदींनी स्वतः पांढरा केला.

परभणी, दि. 8 - मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देते, भाजपाने अशी फक्त खोटी आश्वासने दिली. काळा पैसा मोदींनी स्वतः पांढरा केला.शेतीमालाला हमीभाव दिल्याशिवाय शेतकरी उभारी घेऊ शकत नाही. काँग्रेस सरकारने शेतक-यांना 70 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. परंतु भाजपा सरकार फक्त 50 उद्योगपतींसाठी काम करतेय. काँग्रेस पक्षाने दबाव टाकला म्हणून भाजप सरकारने कर्जमाफी केली. ही कर्जमाफी RSS भाजपावाली कर्जमाफी आहे.मार्केटिंग 35 हजार कोटींची केली, मात्र कर्जमाफी फक्त पाच हजार कोटींची दिली. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केली नाही, काही निवडक शेतक-यांची कर्जमाफी केल्याचाही घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. गेल्या काही तासांपूर्वीसुद्धा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नॅनो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65 हजार कोटी दिले असा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. नॅनो प्रकल्पासाठी मोदी पैसे देतात, पण शेतकऱ्यांना एक रुपया पण देत नाहीत असे राहुल म्हणाले. नांदेडच्या मोंढा मैदानावर राहुल गांधींची जाहीर सभा चालू आहे. राहुल गांधी आज मराठावाडा दौ-यावर आहेत. 

मागच्या तीन वर्षात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असे राहुल म्हणाले. काँग्रेसच्या दबावामुळेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भाजपा सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला असे ते म्हणाले. काळ्या पैशाविरोधातील नरेंद्र मोदींची  मोहीम फेल ठरली आहे. देशाच्या नुकसानीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहे. 2 कोटी युवकांचा रोजगार कुठे गेला ? केवळ स्वप्न दाखवून चालणार नाही त्यांचे भविष्य दाखवा, तीन वर्षांपासून किती युवकांना रोजगार दिला ? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.