शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नांदेडमध्येही मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार!

By admin | Updated: September 19, 2016 05:58 IST

सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी नांदेडकरांनीदेखील अनुभवला़

नांदेड : सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी नांदेडकरांनीदेखील अनुभवला़ लाखोंच्या संख्येत निघालेल्या या अभूतपूर्व मूकमोर्चात अबालवृद्धांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. अत्यंत नियोजनबद्ध निघालेल्या या मोर्चाने नांदेड शहर अक्षरश: गजबजून गेले होते.औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी व हिंगोलीपाठोपाठ निघालेल्या नांदेडच्या या मोर्चाने आजवरच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले़ कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटीचा दुरुपयोग थांबवून या कायद्यात योग्य तो बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, अशा मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तीत निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व युवती तसेच महिलांनी केले़ प्रारंभी जिजाऊ वंदना झाली़ लाखोंचा जनसमुदाय शांत उभा होता़ शेवटी राष्ट्रगीताने समारोप झाला़ तत्पूर्वी सकल मराठा क्रांती मूकमोर्चाच्या वतीने युवतींनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निवेदन दिले़ शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेल्याने साधारणत: सात ते आठ तास शहर जिथल्या तिथे थांबलेले होते. स्वयंसेवकांची फळीही तैनात होती़ त्यामुळे मोर्चा अतिशय सौहार्दपूर्ण झाला.>आता तालुकास्तरीय मोर्चेफलटण / गुहागर : सकल मराठा समाजाच्या वतीने लाखोंच्या संख्येने जिल्हास्तरीय मोर्चे निघत असतानाच आता तालुका पातळीवरील मोर्चांनाही सुरुवात झाली असून, रविवारी फलटण (जि. सातारा) व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे मोर्चे काढण्यात आले. मोर्चात फलटणबरोबरच आसपासच्या तालुक्यांतीलही मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने फलटण बंद पाळून मोर्चाला पाठिंबा दिला. तर गुहागर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच मोर्चा असल्याने याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाजी चौक ते गुहागर पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात एक हजारहून अधिक मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.>मोर्चेकरी युवतींच्या भावनाअ‍ॅट्रॉसिटीचा दुरुपयोग करून दोन समाजांत तेढ निर्माण केली जाते़ ते रोखण्यास कायद्यात आवश्यक तो बदल करून कायदा आणखी कडक करावा, ज्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. आमचा मोर्चा न्यायासाठी आहे़ कोणाला घाबरवण्यासाठी वा कोणत्या जाती-धर्माविरुद्ध नाही़ हा सत्ताधाऱ्यांविरुद्ध, प्रस्थापितांविरुद्ध समाजाने पुकारलेला एल्गार आहे़>आरक्षणाचा मुद्दा : मराठा समाजाला आरक्षण द्या, ही मागणी २५ वर्षांपासून करण्यात येत आहे़ या मुद्द्यावर अनेक जण राजकीय स्वार्थ साधत आहेत़ इतकेच नव्हे, सरकारकडून आरक्षणाच्या विषयावर समाजाची घोर फसवणूक झाली आहे़ काढलेला वटहुकूम कायद्याच्या माध्यमातून पुढे येऊ शकला नाही़ त्यामुळे समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.>कोल्हापुरातही एल्गारची तयारीकोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या वतीने १५ आॅक्टोबरला कोल्हापुरात काढण्यात येणाऱ्या ‘महामूकमोर्चा’त सुमारे १५ लाख मराठा समाजबांधव रस्त्यावर येतील, असा वज्रनिर्धार रविवारी भरपावसात झालेल्या बैठकीत करण्यात आला. येथील जयप्रभा स्टुडिओ परिसरातील शुभंकरोती मंगल कार्यालयात मोर्चाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती.>नेते एकसंध आलेबैठकीत बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कोल्हापूर ही शिव-शाहूंची भूमी असून, तिचा आदर्श इतर सर्व जिल्ह्यांनी घेतला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. या मोर्चाच्या निमित्ताने सर्व राजकीय नेते एकसंध आले, ही आनंददायी बाब आहे. >19 सप्टेंबर रोजी अकोला येथे तर २२ सप्टेंबर रोजी अमरावती येथे सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.उच्चांकी गर्दी!नांदेड येथील मोर्चामध्ये सुमारे १५ लाख समाजबांधव येतील, अशी अपेक्षा सकल मराठा समाजाने व्यक्त केली होती़ मात्र प्रत्यक्षात २५ ते ३० लाखांवर लोक मोर्चाला आले होते, असा दावा आयोजकांनी केला.मोर्चात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय राज्यमंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार-आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींसह सर्वच पक्ष, संघटनांमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़