शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नाना.. ‘जिगरबाज’ बघायला साताऱ्याला या!--‘लोकमत’नं वाढविली उमेद

By admin | Updated: September 9, 2015 08:22 IST

जिल्हा भेटीचं निमंत्रण : औरंगाबाद येथे अविनाश पोळ यांनी ऐकविली सातारी बळीराजाच्या जिद्दीची कहाणी

सातारा : भीषण दुष्काळाला कंटाळून मराठवाड्यातील अनेक शेतकरी अक्षरश: मृत्यूला कवटाळत आहेत. नाउमेद झालेल्या अशा शेतकऱ्यांना धीर देण्याचे, त्यांच्यात लढण्याची जिद्द निर्माण करण्याचे काम अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे करत आहेत. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हातही देत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. अविनाश पोळ यांनी औरंगाबाद येथे नाना पाटेकर यांची भेट घेतली अन् भीषण दुष्काळतही सातारचा ‘जिगरबाज शेतकरी’ कसा जगतोय, हे पाहण्यासाठी पाटेकरांना निमंत्रण दिले.दुष्काळ निवारण आणि खचलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे लागतील, याविषयी नाना पाटेकर आणि पाणीतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ यांच्यात चर्चा झाली. दुष्काळ हटविण्यासाठी तात्पुरते आणि कायमस्वरूपी अशा दोन टप्प्यात उपाययोजना कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्रात सध्या ज्याठिकाणी तीव्र दुष्काळाची छाया आहे अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तसेच ज्याठिकाणी लोकांना नेहमीच दुष्काळाचे चटके सोसावे लागतात, अशा ठिकाणी दीर्घकालीन उपाय योजने अत्यावश्यक बनले आहे. आर्थिक मदतीने किती फायदा होईल, माहीत नाही; पण खचलेल्या, नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज असल्याची भावना नाना पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केली.यावर डॉ. पोळ यांनी सातारा जिल्ह्याचे उदाहरण देऊन मराठवाड्यापेक्षाही साताऱ्यातील अनेक भागात कमी पाऊस पडल्याचे पाटेकरांच्या निदर्शनास आणून दिले. फलटण तालुक्यात तर अवघा २४ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या खाईत लोटला आहे. तलाव आटलेत. विहिरी कोरड्या पडल्यात. कूपनलिकांनी तळ गाठलाय. जनावरांना चारा नाही. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. शेतजमिनी भेगाळल्यात. असे आभाळाएवढं संकट कोसळूनही इथला ‘जिगरबाज शेतकरी’ मात्र जिद्दीनं जगतोय. मिळेल तिथून हंड्याने पाणी आणून पिकं जगतोय, अशी सविस्तर माहिती देऊन डॉ. पोळ यांनी साताऱ्याच्या ‘जिगरबाज शेतकऱ्याची जगण्याची जिद्द कशी आहे, हे पाहण्यासाठी सातारला येण्याचे निमंत्रण नाना पाटेकर यांना दिले. (प्रतिनिधी) ‘लोकमत’नं वाढविली उमेददुष्काळात जीणं अवघड बनल्यानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असतानाच साताऱ्यातला शेतकरी मात्र दुष्काळाशी दोन हात करत जिद्दीनं जगतोय. ‘लोकमत’नं पंधरा दिवसांपासून ‘जिगरबाज शेतकरी’ ही मालिका सुरू केली असून ‘मरायचं नाय.. आता लढायचं हाय, जिद्द सोडू नका, संघर्ष करा,’ असा आशेचा किरण शेतकऱ्यांमध्ये मनात निर्माण केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.