शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

नाना.. ‘जिगरबाज’ बघायला साताऱ्याला या!--‘लोकमत’नं वाढविली उमेद

By admin | Updated: September 9, 2015 08:22 IST

जिल्हा भेटीचं निमंत्रण : औरंगाबाद येथे अविनाश पोळ यांनी ऐकविली सातारी बळीराजाच्या जिद्दीची कहाणी

सातारा : भीषण दुष्काळाला कंटाळून मराठवाड्यातील अनेक शेतकरी अक्षरश: मृत्यूला कवटाळत आहेत. नाउमेद झालेल्या अशा शेतकऱ्यांना धीर देण्याचे, त्यांच्यात लढण्याची जिद्द निर्माण करण्याचे काम अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे करत आहेत. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हातही देत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. अविनाश पोळ यांनी औरंगाबाद येथे नाना पाटेकर यांची भेट घेतली अन् भीषण दुष्काळतही सातारचा ‘जिगरबाज शेतकरी’ कसा जगतोय, हे पाहण्यासाठी पाटेकरांना निमंत्रण दिले.दुष्काळ निवारण आणि खचलेल्या शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नेमके कोणते उपाय करावे लागतील, याविषयी नाना पाटेकर आणि पाणीतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ यांच्यात चर्चा झाली. दुष्काळ हटविण्यासाठी तात्पुरते आणि कायमस्वरूपी अशा दोन टप्प्यात उपाययोजना कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्रात सध्या ज्याठिकाणी तीव्र दुष्काळाची छाया आहे अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तसेच ज्याठिकाणी लोकांना नेहमीच दुष्काळाचे चटके सोसावे लागतात, अशा ठिकाणी दीर्घकालीन उपाय योजने अत्यावश्यक बनले आहे. आर्थिक मदतीने किती फायदा होईल, माहीत नाही; पण खचलेल्या, नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज असल्याची भावना नाना पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केली.यावर डॉ. पोळ यांनी सातारा जिल्ह्याचे उदाहरण देऊन मराठवाड्यापेक्षाही साताऱ्यातील अनेक भागात कमी पाऊस पडल्याचे पाटेकरांच्या निदर्शनास आणून दिले. फलटण तालुक्यात तर अवघा २४ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या खाईत लोटला आहे. तलाव आटलेत. विहिरी कोरड्या पडल्यात. कूपनलिकांनी तळ गाठलाय. जनावरांना चारा नाही. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. शेतजमिनी भेगाळल्यात. असे आभाळाएवढं संकट कोसळूनही इथला ‘जिगरबाज शेतकरी’ मात्र जिद्दीनं जगतोय. मिळेल तिथून हंड्याने पाणी आणून पिकं जगतोय, अशी सविस्तर माहिती देऊन डॉ. पोळ यांनी साताऱ्याच्या ‘जिगरबाज शेतकऱ्याची जगण्याची जिद्द कशी आहे, हे पाहण्यासाठी सातारला येण्याचे निमंत्रण नाना पाटेकर यांना दिले. (प्रतिनिधी) ‘लोकमत’नं वाढविली उमेददुष्काळात जीणं अवघड बनल्यानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असतानाच साताऱ्यातला शेतकरी मात्र दुष्काळाशी दोन हात करत जिद्दीनं जगतोय. ‘लोकमत’नं पंधरा दिवसांपासून ‘जिगरबाज शेतकरी’ ही मालिका सुरू केली असून ‘मरायचं नाय.. आता लढायचं हाय, जिद्द सोडू नका, संघर्ष करा,’ असा आशेचा किरण शेतकऱ्यांमध्ये मनात निर्माण केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.