शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नाम संस्था; नव्हे चळवळ

By admin | Updated: August 29, 2016 03:41 IST

नाम फाउंडेशनने कोरड्या पडलेल्या जमिनीलाच नव्हे तर कोरड्या होत चाललेल्या माणुसकीला पाझर फोडला आहे. समाजाकडून आपण शेतकऱ्यांचे ऋण फेडत आहोत

पुणे : नाम फाउंडेशनने कोरड्या पडलेल्या जमिनीलाच नव्हे तर कोरड्या होत चाललेल्या माणुसकीला पाझर फोडला आहे. समाजाकडून आपण शेतकऱ्यांचे ऋण फेडत आहोत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी बीज रोपण केलेली नाम फाउंडेशन ही केवळ संस्था राहिलेली नसून महाराष्ट्रभर एक चळवळ म्हणून विस्तारत आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.माहेर प्रतिष्ठानतर्फे कॉ. के. आर. पाटील व सुनंदा पाटील स्मृतीप्रीत्यर्थ नाम फाउंडेशनला कृष्णानंद पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. केसरीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात फाउंडेशनच्या परभणी विभागाचे समन्वयक कांतराव देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे, भोई प्रतिष्ठानचे मिलिंद भोई, उद्योगपती विठ्ठल मणियार, एकनाथ पाटील, गुरुनाथ पंडित, मीना नाईक उपस्थित होते.माशेलकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र विद्या, कला, उद्योग, मूल्ये आदी क्षेत्रात पहिला असावा. पण महाराष्ट्रात दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बघितले तर त्यातही महाराष्ट्र अव्वल आहे, हे चिंताजनक आहे. लोकमान्य टिळक शंभर वर्षांपूर्वी स्वराज्यासाठी लढत होते. आज आपण सुराज्यासाठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे.’’धनराज साठे यांनी पालकत्व घेतलेल्या ५० पोतराजांच्या मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सिने कलाकार मिहीर सोनी, प्राजक्ता गायकवाड, पार्थ भालेराव, ऋतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील यांनी मुलांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘जगणे हीच सुंदर कविता आहे. ग्लॅमर असलेल्या चित्रपट जगतातील लोक महागड्या वाहनांतून येतात. फोटो काढतात, सह्या देतात. हेच त्यांना सुंदर आयुष्य वाटते. पण येथे सामान्य चेहरे पाहिले, की आतून समाधान वाटते. काही अपंग मुलांना पालक आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण देत असतात, तेव्हा तेच पालक व शिक्षक मोठे समाजकार्य करत असतात. आज आपण राजकारण, व्यसन, जात, पंथ, रूप, यात अडकून पडलो आहोत. पण समाजाला पाण्याच्या क्रांतीचा, हरित क्रांतीची व स्नेहाच्या क्रांतीची गरज आहे. कांतराव देशमुख म्हणाले, ‘‘नाम फाउंडेशनला जोडल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझे सामाजिक काम पाहून नाना व मकरंद यांनी मला या कार्यात जोडून घेतले. मराठवाड्यात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेतून ५७० किमी लांबीचे ओढे, नाले खोदले. मराठवाड्यातील लेनी नावाचा एक ओहळ होता त्या ओहळाचे खोलीकरण केले. त्यामुळे ती ओहळ गावची जीवनदायीनी झाली. लोकांनी तिचे ‘नाम नदी’ असे नामकरण केले.’’