शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

नाम संस्था; नव्हे चळवळ

By admin | Updated: August 29, 2016 03:41 IST

नाम फाउंडेशनने कोरड्या पडलेल्या जमिनीलाच नव्हे तर कोरड्या होत चाललेल्या माणुसकीला पाझर फोडला आहे. समाजाकडून आपण शेतकऱ्यांचे ऋण फेडत आहोत

पुणे : नाम फाउंडेशनने कोरड्या पडलेल्या जमिनीलाच नव्हे तर कोरड्या होत चाललेल्या माणुसकीला पाझर फोडला आहे. समाजाकडून आपण शेतकऱ्यांचे ऋण फेडत आहोत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी बीज रोपण केलेली नाम फाउंडेशन ही केवळ संस्था राहिलेली नसून महाराष्ट्रभर एक चळवळ म्हणून विस्तारत आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.माहेर प्रतिष्ठानतर्फे कॉ. के. आर. पाटील व सुनंदा पाटील स्मृतीप्रीत्यर्थ नाम फाउंडेशनला कृष्णानंद पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. केसरीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात फाउंडेशनच्या परभणी विभागाचे समन्वयक कांतराव देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे, भोई प्रतिष्ठानचे मिलिंद भोई, उद्योगपती विठ्ठल मणियार, एकनाथ पाटील, गुरुनाथ पंडित, मीना नाईक उपस्थित होते.माशेलकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र विद्या, कला, उद्योग, मूल्ये आदी क्षेत्रात पहिला असावा. पण महाराष्ट्रात दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बघितले तर त्यातही महाराष्ट्र अव्वल आहे, हे चिंताजनक आहे. लोकमान्य टिळक शंभर वर्षांपूर्वी स्वराज्यासाठी लढत होते. आज आपण सुराज्यासाठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे.’’धनराज साठे यांनी पालकत्व घेतलेल्या ५० पोतराजांच्या मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सिने कलाकार मिहीर सोनी, प्राजक्ता गायकवाड, पार्थ भालेराव, ऋतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील यांनी मुलांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘जगणे हीच सुंदर कविता आहे. ग्लॅमर असलेल्या चित्रपट जगतातील लोक महागड्या वाहनांतून येतात. फोटो काढतात, सह्या देतात. हेच त्यांना सुंदर आयुष्य वाटते. पण येथे सामान्य चेहरे पाहिले, की आतून समाधान वाटते. काही अपंग मुलांना पालक आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण देत असतात, तेव्हा तेच पालक व शिक्षक मोठे समाजकार्य करत असतात. आज आपण राजकारण, व्यसन, जात, पंथ, रूप, यात अडकून पडलो आहोत. पण समाजाला पाण्याच्या क्रांतीचा, हरित क्रांतीची व स्नेहाच्या क्रांतीची गरज आहे. कांतराव देशमुख म्हणाले, ‘‘नाम फाउंडेशनला जोडल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझे सामाजिक काम पाहून नाना व मकरंद यांनी मला या कार्यात जोडून घेतले. मराठवाड्यात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेतून ५७० किमी लांबीचे ओढे, नाले खोदले. मराठवाड्यातील लेनी नावाचा एक ओहळ होता त्या ओहळाचे खोलीकरण केले. त्यामुळे ती ओहळ गावची जीवनदायीनी झाली. लोकांनी तिचे ‘नाम नदी’ असे नामकरण केले.’’