शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

नामदेवांची अभंगसंपदा

By admin | Updated: April 2, 2015 03:13 IST

सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेवांनी पंजाब प्रांतात पाऊल ठेवले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर म्हणजे साधारण

सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेवांनी पंजाब प्रांतात पाऊल ठेवले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर म्हणजे साधारण १२९६ नंतर पंजाबात प्रबोधनाची पताका रोवली. घुमान हे गाव त्यांनीच वसवले, असेही मानले जाते. शीखांच्या पवित्र ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांच्या अनेक रचना आहेत. त्यांचे ६२ अभंग ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. नामदेवांचे अभंग मराठीत असले तरी ग्रंथसाहिबमध्ये ते पंजाबीमिश्रित मराठी, संस्कृत भाषांतरित आहेत. अन्य सहा गुरूंच्या रचनांबरोबर विविध भागांत समाविष्ट करण्यात आले आहेत. उत्कट भावभक्ती आणि उदात्त विचार असलेली अभंगगाथा नामदेवांनी हिंदीमध्येही शब्दबद्ध केल्याने ते सर्वांना प्रेरक ठरली आहे. ‘ग्रंथसाहिबा’तील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या 'शबद' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणाऱ्या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे.ईश्वराची महती अवर्णनीय आहे आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही सुरनर मुनिजनांच्या तत्त्वाचा पार लागलेला नाही, याचे स्पष्टीकरण देताना नामदेव म्हणतात-केते पच गये हैं, कोटी ब्रम्हा। सूरनर मुनिजन पार न पावै।।तजू अभिमान कर निरमल करमा। नामदेव के स्वामी अंतरयामा।अगम अगाध हे तुमरी महिमा।। छीपेके घरि जनमु दैला,गुरु उपदेसू भैला। संतनके परसादि, नामा हरि भेटुला।।ही रचना उघड उघड मराठी वळणाची आहेच; मला शिंपी कुळात जन्म मिळाला, नव्हे, तो ईश्वराने दिला; पण गुरुपदेश झाला आणि मी पावन झालो. जात-जमात, पंथ, प्रदेश यांच्या पलीकडे पोहोचलो. हे सारे संतसहवासातून घडले. (भावार्थ)‘नामदेव देके गुरु शिखावे खेचरी मुद्रा गाई,प्रणवत नामा परम ततरे, सतिगुरू निकटी बताईला,खेचर भुचर तुलसी माला, गुरु प्रसादी पाइआ।।प्रभूची महती असामान्य आहे, असे सांगत सदगुरूविषयींचा पूज्यभाव नामदेवांनी या अभंगातून मांडला आहे. (लेखक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत.)