शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा बॉम्ब प्रकरण : दोन दिवसानंतरही भंडारआळी भेदरलेलीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:24 IST

नालासोपाऱ्यातील वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून एटीएसने २२ बॉम्ब आणि आणखी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्यामुळे हादरलेली भंडारआळी भेदरलेलीच आहे.

- अजय महाडिकनालासोपारा - नालासोपाऱ्यातील वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून एटीएसने २२ बॉम्ब आणि आणखी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्यामुळे हादरलेली भंडारआळी भेदरलेलीच आहे.१० आॅगस्टला जेव्हा रात्री छापे सुरू झाले तेव्हा त्या परिसरात जो तो घराबाहेर आला. वैभव आणि त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची कोणालाच परवानगी नव्हती. त्यांच्या घराच्या पायरीजवळही कोणाला जाऊ दिले जात नव्हते. असे असतानाही अख्खी रात्र आळी जागी राहिली.वैभव गो हत्येच्या विरोधात आहे. याबाबत जागृतीच्या उपक्रमात तो सक्रीय असतो. हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. तो समाजविघातक काम करणार नाही, असे ग्रामस्थ ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे कारवाईच्या दुसºया दिवशी अनेक जण कामावर गेले नाहीत की घरात चूल पेटली नाही. एटीएसच्या कार्यपद्धतीवरनाराज असलेल्या स्थानिकांनी वैभवचा अतिरेकी असा उल्लेख करणाºया मीडियावरही तोंडसुख घेतले.जोपर्यंत एखाद्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत तो दोषी ठरत नसतानाही काही माध्यमे भगवा अतिरेकी, आंतकवादी म्हणत असल्याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला. छापासत्रानंतर त्याचे कुटुंबीयही अद्याप सावरलेले नाहीत. त्याची आई आजारी होती. छाप्याचा तिने धसका घेतला आहे.जेलभरोचा इशारा; सह्यांची मोहीमनालासोपाºयातील साधकांनी, गो रक्षक तसेच हिंदुत्त्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी वैभवच्या समर्थनासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली असून जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात दोन बंद झाल्यामुळे पुन्हा बंद न पाळता हिंदुत्त्ववाद्यांचे एकत्रीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे शुक्रवारच्या मूक मोर्चावेळी डहाणू ते अलिबाग या पट्ट्यातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, या अटकेच्या निषेधार्थ वैभवच्या घरासमोर रविवारी स्थानिकांनी सभा घेतली. या कारवाईबाबत तीव्र भावना व्यक्त करतानाच या अटकेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी, १७ आॅगस्टला भंडारआळी ते सिव्हिक सेंटरयेथील पंचमुखी मारूतीच्या मंदिरापर्यंत मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. काळ््या फिती बांधून मोर्चात सहभागीहोण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.‘वैभवच्या कबुलीवर विश्वास नाही’सत्य बाहेर येईलच, पण एटीएस म्हणते म्हणून वैभवकडे समाजविघातक वस्तू सापडल्याचे आम्ही मान्य करणार नाही. जर घरात या वस्तू सापडल्या तर एटीएसने गावातील व्यक्तींना पंच म्हणून बोलावून त्या दाखवायला हव्या होत्या. मग आम्ही विश्वास ठेवला असता, असे ग्रामस्थ प्राजक्ता पाटील यांनी सांगितले. वैभवने गुन्हा कबुल केल्याचे आता एटीएसने सांगितले, तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही. कारण त्याला गुन्हा कबुल करायलाही भाग पाडले जाऊ शकते, असा दावाही जमलेल्या ग्रामस्थांनी केला.‘स्फोटके, बॉम्बची सामग्री बाहेरून आणून ठेवली’एटीएसच्या कार्यपद्धतीवर वैभवची पत्नी लक्ष्मी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एटीएसचे अधिकारी घराच्या एका खोलीत होते, त्यांनी काय सामान आणले? काय नेले? याची कोणतीही माहिती आम्हाला दिली नाही आणि नंतर फोन करुन वैभवला आम्ही अटक केल्याचे सांगितले. ही कामाची कोणती पद्धत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्फोटके, बॉम्ब, त्याची सामग्री पोलिसांनी बाहेरून आणून घरात ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.त्या म्हणाल्या, गुरूवारी मध्यरात्री पावणेचार वाजता पोलीस घरी आले. तुझी चौकशी करायची आहे, असे सांगून त्याला गाडीत घालून घेऊन गेले. वैभवशी बोलण्याची संधीही दिली नाही. आम्हाला दिवसभर एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले. रात्री दहा वाजता मोठ्या बंदोबस्तात पोलीस वैभवला घरात घेऊन आले. जवळपास पंचवीसपेक्षा जास्त पोलीस पहिल्या मजल्यावरील आमच्या घरात आले. मध्यरात्री दीड वाजता पोलीस गोणी व पिशव्या बाहेरून घेऊन आमच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये आले. सकाळपर्यंत ते चौकशी करत होते. सकाळी सात वाजता पोलिसांनी हे सामान घराबाहेर काढले. तेव्हा ते मुंबईतील पत्रकार सोबत घेऊन आले होते, हे आम्हाला पहिल्यांदा समजले.पाठोपाठ पोलीस वैभवला चेहरा झाकून घराबाहेर घेऊन गेले. तेथे साधा पंचनामाही केला नाही, असा दावा त्यांनी केला. आमचे घर तीन मजली आहे. तळमजल्यावर व दुसºया मजल्यावर चुलते राहतात. मग पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी का केली नाही. फक्त आमची खोली तपासण्याचा बनाव का करण्यात आला? असा प्रश्न करून वैभव निरपराध असल्याचा आणि त्याला या प्रकरणात विनाकारण गोवल्याचा दावा त्यांनी केला.शस्त्रांवरील ठशांवरून शोध सुरू मुंबई : नालासोपाºयातून अटक केलेल्या हिंदुत्त्ववादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकरची राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून कसून (एटीएस) चौकशी सुरू आहे. राऊतकडे सापडलेले बॉम्ब, स्फोटके, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि गोंधळेकरकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्यावरील बोटांच्या ठशांवरून तपास सुरु आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छाप्यांचे सत्र सुरू असल्याने या प्रकरणात आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता आहे.एटीएसच्या पथकाने राऊतच्या नालासोपाºयातील घर आणि दुकानातून २२ गावठी बॉम्बसह सुमारे ५० बॉम्ब बनतील एवढी स्फोटके, बॅटºया, डिटोनेटर्स आदी साहित्य आणि महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली. त्यावरील ठसेही तपासले जात आहेत. त्यानुसार, तिघांची एकत्र आणि स्वतंत्र चौकशी सुरु आहे. हे ठसे या तिघांच्या किंवा त्यांच्या नियमित संपकार्तील व्यक्तींशी जुळत आहेत का, तेही तपासले जात आहे. सध्या १५ हून अधिक संशयितांकडे चौकशी सुरु आहे. त्यामुळे आणखी काही जणांना अटक होऊ शकते, अशी शक्यता एटीएसच्या अधिकाºयांनी व्यक्त केली.कोल्हापुरातून कळसकरचे दोन साथीदार ताब्यातकोल्हापूर : स्फोटके बाळगणाºया शरद कळसकरच्या दोघा साथीदारांना कोल्हापुरातून दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी ताब्यात घेतल्याचे समजते. तपासासंबंधी पूर्णत: गोपनीयता पाळली जात आहे.कळसकर याचे चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात वास्तव्य होते. तो येथील एका औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात लेथ मशीनवर काम करीत होता. कळसकर कोल्हापुरात असताना कोणाच्या संपर्कात होता, त्याचे मोबाईलवर कोणाशी, किती वेळा बोलणे झाले, त्याच्या चर्चेत कोणते मुद्दे होते, पानसरेंच्या खुनाशी त्याचा काही संबंध आहे का?, याची माहिती घेण्यासाठी त्याच्या मोबाईलचे सीडीआर मागवले आहेत. 

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र