शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर हिंसाचार : ‘त्यांचा’ रोखठोक हिशेब होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:59 IST

दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला.

मुंबई : नागपूरमध्ये सोमवारी घडलेली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. त्याला कुणाचे समर्थन होते याची चौकशी केली जाईल. दंगलखोरांच्या हल्ल्यात तीन पोलिस उपायुक्तांसह ३५ पोलिस जखमी झाले. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांचा रोखठोक हिशेब होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत निवेदन करताना दिला. दरम्यान, नागपूरच्या घटनेवरून गदारोळ झाल्यामुळे सभापती प्रा. राम शिंदे यांनी  कामकाज दोनदा तहकूब केले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत नागपूरच्या घटनेमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही अशी शंका येते, अशी टिप्पणी केली. पोलिसांवर हल्ले झाले, दुकाने जाळली, वाहने पेटविली. सरकारमधील मंत्रीच बेजबाबदार विधाने करत आहेत. राज्यात जातीय विष पेरण्याचे काम भूषणावह नाही, असे ते म्हणाले. तर भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी हा पूर्वनियोजित कट होता. या घटनेची पूर्ण चौकशी करून मास्टर माईंड कोण आहे ते शोधून काढावा, अशी मागणी केली.

कट रचले जात आहेत...उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देताना राज्य अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचे कट रचले जात आहेत, असा आरोप केला. गेल्या काही दिवसांत अफवांना बळी पडून राज्यात दुर्दैवी घटना घडत आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही. राज्यातील आक्रमकांच्या खुणा पुसून टाकल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

दोन्ही बाजूचे आमदार आले आमने-सामने नागपूर हिंसाचाराचे पडसाद विधानभवनाच्या आवारात उमटले. सत्ताधारी आमदारांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी, तर विरोधकांकडून  मंत्री नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन झाले. दोन्ही बाजूचे आमदार आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर