शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

Shivsena: पक्ष नेतृत्वावर आरोप करत शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा ‘जय महाराष्ट्र’; विदर्भात दुसरा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:36 IST

नुसतं पद घेऊन घरी बसणं अशी यंत्रणा पक्षात सुरु आहे त्यामुळे हे पक्षासाठी चांगले नाही त्यामुळे मी पक्षातून बाजू होण्याचं ठरवलं. याबाबत मी पक्षप्रमुखांना ईमेल करुन कळवलं आहे असं शेखर सावरबांधे सांगितले.

ठळक मुद्देमाझ्या निर्णयामुळे इतर जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा, जर माझ्या राजीनाम्यामुळे त्यांना न्याय मिळाला तर त्यात आनंद आहेआता पक्षासाठी ज्यांनी काम केले त्यांना डावलून इतरांना संधी देण्यात आली. पूर्व विदर्भाकडे बारकाईनं संघटनेकडे लक्ष देण्याची गरज होती. मात्र तसं झालं नाही.

नागपूर – अलीकडेच वर्ध्यातील शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विदर्भात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते आणि विदर्भाचे संपर्कप्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. बाहेरुन आलेल्यांना पक्षात संधी दिली जाते आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येते असा आरोप करत सावरबांधे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. याबाबत शेखर सावरबांधे म्हणाले की, माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे हा काळ पक्षवाढीचा असतो अशी अपेक्षा असते. परंतु गेल्या काही दिवसांत नवीन नवीन लोकांना पक्षात आणताना ज्यांनी याआधी कुठेही चांगले काम केले नाही अशांना पक्षात सामाविष्ट करण्यात आलं. आमच्या सहसंपर्क प्रमुख गजानन किर्तीकर यांनाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जात नसावं असं त्यांच्या अर्भिभावावरून लक्षात येते. मग त्यांच्यासारख्या नेत्यांना डावललं जात असेल तर आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नाही. बाहेरुन आलेल्या पक्षांना पदं वाटप केली जात असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नव्हतो. नुसतं पद घेऊन घरी बसणं अशी यंत्रणा पक्षात सुरु आहे त्यामुळे हे पक्षासाठी चांगले नाही त्यामुळे मी पक्षातून बाजू होण्याचं ठरवलं. याबाबत मी पक्षप्रमुखांना ईमेल करुन कळवलं आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच माझ्या निर्णयामुळे इतर जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. जर माझ्या राजीनाम्यामुळे त्यांना न्याय मिळाला तर त्यात आनंद आहे. मी जिल्हाप्रमुख असताना अनेक कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले. मात्र आता पक्षासाठी ज्यांनी काम केले त्यांना डावलून इतरांना संधी देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते नाउमेद होतात. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पार्टीकडे आकर्षित होत होते. भाजपातील अनेक जण शिवसेनेत आले. परंतु आता पूर्व विदर्भाकडे बारकाईनं संघटनेकडे लक्ष देण्याची गरज होती. मात्र तसं झालं नाही. माझी कुणाबद्दल तक्रार नाही. माझ्यासोबत कोणी पक्ष सोडावा असा कोणताही आग्रह कुणाला केला नाही असंही शेखर सावरबांधे यांनी स्पष्ट केले आहे.

कोण आहेत शेखर सावरबांधे?

गेल्या २० वर्षापासून शेखर सावरबांधे हे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आहेत. नागपूर महापालिकेत त्यांनी उपमहापौर म्हणून काम केलंय. विदर्भातील शिवसेनेतील मोठे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असला तरी ते अद्याप कुठल्या पक्षात जाणार याचा खुलासा झाला नाही.  

टॅग्स :Shiv Senaशिवसेना