शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा - विश्वास उटगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:31 IST

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे.

कोल्हापूर : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे. नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.उटगी म्हणाले, नोटाबंदीने उद्ध्वस्त झालाच; पण त्याबरोबर उद्योग व्यवसायांना घरघर लागली. त्यातून अजूनही देश सावरलेला नाही, गेल्या तीन वर्षांत मागील ४५ वर्षांतील बेरोजगारीचा आकड्यांचा विक्रम मोडला आहे. चलनातून रद्द केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा चलन व्यवस्थेत ८६.४४ टक्के हिस्सा होता. सरकारच्या आदेशाप्रमाणे विहीत वेळेत ९९.३० टक्के जुने चलन परत आल्याचे केंद्र सरकार सांगते; पण देशातील जिल्हा मध्यवर्ती बॅँकांकडील ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्याच नाहीत. नेपाळ, भूतान या देशांतील भारतीय चलन तसेच असताना सरकार कोणते आकडे देशासमोर ठेवत आहे, असा सवाल उटगी यांनी केला.रिझर्व्ह बॅँकेने २०१५ ते २०१८ या चार वर्षांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये एकूण चलनाची प्रत्यक्ष आकडेवारी दिली आहे. ५०० रुपयांच्या नवीन नोटा छापल्या; पण त्यांचे प्रमाण जास्त असल्याचे रिझर्व्ह बॅँकच सांगते. मग या नोटा कोणाच्या परवानगीने छापल्या याचे उत्तर रिझर्व्ह बॅँकेने देशातील जनतेला दिले पाहिजे, असे आव्हान विश्वास उटगी यांनी दिले.रिझर्व्ह बॅँकेने दीड लाखकोटीच्या जादा चलनाबद्दल खुलासा करावा, अशी मागणी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने केली आहे. संसदेचे शेवटचे अधिवेशन सुरू आहे, यामध्ये संयुक्त संसदीय समिती स्थापन करून जादा चलनाची चौकशी करावी, अन्यथा येत्या आठवडाभरात न्यायालयीन लढाई सुरू केलीजाईल, असा इशारा त्यांनीदिला.‘जीडीपी’ची सर्वाधिक घसरणकेंद्र सरकार ‘जीडीपी’च्या आकडेवारीमध्ये गडबड करत आहे. पावणेदोन टक्के इतकी प्रचंड घसरण जीडीपीमध्ये झाली असून, हे अच्छे दिनाचे द्योतक म्हणायचे काय? असा सवालही उटगी यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर