शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

नाफेडची तूर खरेदी बंद, शेतकरी आले अडचणीत

By admin | Updated: April 24, 2017 04:05 IST

नाफेडने तूरखरेदी बंद केल्यामुळे खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर पडून असून केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

परभणी/यवतमाळ : नाफेडने तूरखरेदी बंद केल्यामुळे खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर पडून असून केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शनिवारपासून नाफेडने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी सुरूच राहील, अशी वल्गना करणारे राज्य सरकार सपशेल तोंडघशी पडले आहे. लाखो क्विंटल तुरीची अद्यापही खरेदी झालेली नाही. सरकारने नाफेडमार्फत ५०५० रुपयांनी तूर खरेदी केली; मात्र खरेदी केंद्रे बंद होताच व्यापाऱ्यांनी तुरीचा भाव पाडला असून केवळ ३००० ते ४००० प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांकडील तूर खरेदी केली जात आहे.लातूर, सोलापूर, अकोला, हिंगोली, परभणी, यवतमाळ या तूर उत्पादक जिल्ह्यांतील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे, खते याची जुळवाजुळव कशी करावी, या आर्थिक विंवचनेत सापडला आहे. अकोला जिल्ह्यात २०८४ गाड्यांची रांग अजूनही खरेदी केंद्राबाहेर आहे. परभणी येथील नाफेडचे हमीभाव तूर खरेदी केंद्र बंद झाल्यानंतरही रविवारी या केंद्रासमोर शेकडो वाहनांच्या रांगा कायम होत्या. केंद्र सुरु होईल, या आशेने अजूनही शेतकरी खरेदी केंद्रासमोर ठाण मांडून आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यात तुरीचे उत्पादन वाढले. मात्र, परंतु, खुल्या बाजारपेठेमध्ये तुरीचा भाव गडगडला. कमी दराने तुरीची खरेदी व्यापाऱ्यांनी सुरु केली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्रे सुरु केली. खरेदी केंद्रासमोर सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या रांगा होत्या. मात्र, कधी बारदाना, तर कधी साठवणुकीचे कारण पुढे करत या केंद्रांवरील खरेदी थांबवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांकडील सगळी तूर खरेदी झालीच नाही.सव्वातीन लाख क्विंटलचे काय?यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर चक्क पोलीस संरक्षणात तूर खरेदी करावी लागली. तरीही ४० हजार क्विंटल तूर खरेदी होऊ शकली नाही. सव्वा तीन लाख क्विंटलची टोकनव्दारे नोंदणी केली होती. त्या तुरीचे आता काय होणार, असा प्रश्न आहे.शेतकऱ्यांचा रुद्रावतारनाफेडकडून व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केली जात असल्याने यवतमाळ येथील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात तोडफोड केली. प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी तुरीचे मोजमापच बंद केले. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना रात्रभर बाजार समितीच्या आवारातच थांबावे लागले.