शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नाफेडची तूर खरेदी बंद, शेतकरी आले अडचणीत

By admin | Updated: April 24, 2017 04:05 IST

नाफेडने तूरखरेदी बंद केल्यामुळे खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर पडून असून केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

परभणी/यवतमाळ : नाफेडने तूरखरेदी बंद केल्यामुळे खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर पडून असून केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शनिवारपासून नाफेडने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी सुरूच राहील, अशी वल्गना करणारे राज्य सरकार सपशेल तोंडघशी पडले आहे. लाखो क्विंटल तुरीची अद्यापही खरेदी झालेली नाही. सरकारने नाफेडमार्फत ५०५० रुपयांनी तूर खरेदी केली; मात्र खरेदी केंद्रे बंद होताच व्यापाऱ्यांनी तुरीचा भाव पाडला असून केवळ ३००० ते ४००० प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांकडील तूर खरेदी केली जात आहे.लातूर, सोलापूर, अकोला, हिंगोली, परभणी, यवतमाळ या तूर उत्पादक जिल्ह्यांतील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे, खते याची जुळवाजुळव कशी करावी, या आर्थिक विंवचनेत सापडला आहे. अकोला जिल्ह्यात २०८४ गाड्यांची रांग अजूनही खरेदी केंद्राबाहेर आहे. परभणी येथील नाफेडचे हमीभाव तूर खरेदी केंद्र बंद झाल्यानंतरही रविवारी या केंद्रासमोर शेकडो वाहनांच्या रांगा कायम होत्या. केंद्र सुरु होईल, या आशेने अजूनही शेतकरी खरेदी केंद्रासमोर ठाण मांडून आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यात तुरीचे उत्पादन वाढले. मात्र, परंतु, खुल्या बाजारपेठेमध्ये तुरीचा भाव गडगडला. कमी दराने तुरीची खरेदी व्यापाऱ्यांनी सुरु केली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्रे सुरु केली. खरेदी केंद्रासमोर सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या रांगा होत्या. मात्र, कधी बारदाना, तर कधी साठवणुकीचे कारण पुढे करत या केंद्रांवरील खरेदी थांबवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांकडील सगळी तूर खरेदी झालीच नाही.सव्वातीन लाख क्विंटलचे काय?यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर चक्क पोलीस संरक्षणात तूर खरेदी करावी लागली. तरीही ४० हजार क्विंटल तूर खरेदी होऊ शकली नाही. सव्वा तीन लाख क्विंटलची टोकनव्दारे नोंदणी केली होती. त्या तुरीचे आता काय होणार, असा प्रश्न आहे.शेतकऱ्यांचा रुद्रावतारनाफेडकडून व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केली जात असल्याने यवतमाळ येथील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात तोडफोड केली. प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी तुरीचे मोजमापच बंद केले. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना रात्रभर बाजार समितीच्या आवारातच थांबावे लागले.