शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले; अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 20:04 IST

मुंबईतील वायकर विजयाचा वाद शमत नाही तोच पदवीधर मतदार यादीत चाळीस हजार नावे वगळल्यावरून ठाकरे गटाने निवडणूक आयोगावरच आक्षेप घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामानंतर राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुंबईतील ईव्हीएम वाद शमत नाही तोच पदवीधर मतदार यादीत चाळीस हजार नावे वगळल्यावरून ठाकरे गटाने निवडणूक आयोगावरच आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या मुलीचेही नाव वगळल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, मात्र ती कोणाच्या तरी दावणीला बांधली आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने काम करत आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आमच्या पक्षाची नावे ठरवून बाद केली आहेत. माझ्या स्वतःच्या मुलीचे नाव देखील रिजेक्ट झाले आहे, असा गंभीर आरोप परब यांनी केला आहे. 

भाजपने नोंदणी केलेली नावे मात्र बरोबर ठेवण्यात आलेली आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी आमचे फोन घेत नाहीत. आमची नावे ठरवून बाद केली आहेत. नावे का गाळली गेली हे आम्हाला समजायला हवे. एकाच घरातील व्यक्तींना वेगवेगळी लांबची मतदान केंद्रे देण्यात आलेली आहेत. तक्रारी आल्या तरी निवडणूक आयोग ऐकत नाहीय, असा आरोप परब यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर केला आहे. 

उत्तर पश्चिम सारखा प्रकार होऊ नये. पारदर्शक पद्धतीने काम करावे. आम्ही जी नोंदणी केली त्यातील १० ते १२ हजार नाव गाळली आहेत. जो पर्यंत आमदारांच्या पात्र अपात्रतेचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत विधान परिषदेच्या अकरा जागांवरील निवडणूक घेवू नये, अशी विनंती आम्ही निवडणूक आयोगाला करणार आहोत, असे परब म्हणाले.  

टॅग्स :Anil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग