शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

माझे मंत्रिपद कुणाच्या मेहेरबानीवर नव्हे..!

By admin | Updated: May 4, 2017 23:27 IST

सदाभाऊंचा टोला; चळवळीमुळेच मिळाली सत्ता

कोल्हापूर : हा सदाभाऊ चळवळीच्या मुशीतून तयार झालेला नेता आहे. ओठांवर मिशी फुटली नव्हती तेव्हापासून चळवळीत आहे; परंतु मिशा फुटल्यावर चळवळीत आलेले काहीजण माझ्याबद्दल शंका घेत आहेत. मी शांत आहे याचा अर्थ कमजोर आहे असा नव्हे. या चळवळीने, तुम्ही शेतकऱ्यांनी मला घडवलं... तुम्हीच नेतृत्व दिलं आणि सत्तेत बसवलं. कुणाच्या मेहरबानीवर मला मंत्रिपद मिळालेले नाही, असा टोला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे लगावला. निमित्त होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या कर्जमुक्ती मोर्चाचे. सदाभाऊ या मोर्चाला येणार की नाही, याबद्दल मोठी उत्सुकता होती. ते मोर्चाला आले नाहीत; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सभेला उपस्थित राहिले व आपल्या मनातील सल बोलून दाखविली. त्यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे शेट्टी व त्यांच्यातील दरी चांगलीच रुंदावली असल्याचेही दिसले.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी दसरा चौकातून दुपारी अडीच वाजता निघालेला हा मोर्चा सव्वातीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तिथे उपस्थित शेतकऱ्यांतही सदाभाऊ येणार का, हीच उत्सुकता होती. सदाभाऊ ४ वाजून १० मिनिटांनी तिथे आले. त्यावेळी टाळ्या व शिट्ट्यांचा पाऊस पडला. हौशी कार्यकर्त्यांनी या दोघांच्या हस्तांदोलनाचे क्षणही मोबाईलमध्ये टिपले. वृत्तपत्र छायाचित्रकारांचीही गर्दी उसळली. रविकांत तूपकर यांनी सदाभाऊंना जागा करून दिली. शेट्टी यांनी हसून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ‘सदाभाऊ... सदाभाऊ, धुमधडाका’ अशा घोषणा काहींनी दिल्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद नव्हता.सदाभाऊ म्हणाले, ‘आज या मोर्चाला येताना मुख्यमंत्र्यांची भेट झाली. त्यांना शेतकरी खवळला असल्याचे सांगितले. त्यांनी शेतकऱ्याला १०० टक्के कर्जमुक्त करायचे आहे, त्याबद्दल शंका बाळगू नका, असे सांगितले आहे. ते करताना ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांचाही विचार आम्ही करणार आहोत. चळवळीपासून मी जराही बाजूला गेलेलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जीव ओवाळून टाकण्याची माझी तयारी आहे. मी काय व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून तयार झालेला नेता नाही. काळी माती कपाळाला लावून येरवडा जेलमध्ये गेलो म्हणून नेता झालो, हे कुणी विसरु नये. राजाची कपडे घालून सिंहासनावर बसणारा बेगडी राजा मी नव्हे. मी रणांगणात लढणारा शिपाई आहे आणि कधी तलवार काढायची याचेही ज्ञान मला आहे.’मी सरकारमध्ये शेतकरी व स्वाभिमानी संघटनेचा प्रतिनिधी म्हणूनच सत्तेत असल्याचे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांची चळवळ मला नवीन नाही. गेली तीस वर्षे अनेक प्रश्नांसाठी मी राजू शेट्टी यांच्यासोबत लढलो आहे. त्यासाठी लाठ्या झेलल्या, तुरुंगात गेलो. अनेकांचा रोष पत्करला; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची बांधीलकी सोडली नाही. आज सरकारमध्ये असतानाही शेतकऱ्यांचेच प्रश्न सोडविण्याचे काम मी प्रामाणिकपणे करीत आहे. विरोधी पक्षांच्या ध्यानीमनी नव्हते तेव्हा आम्ही तुळजापूरमध्ये जाऊन सातबारा कोरा करण्याच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले.’