शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘हे न्हवं माझं सरकार!’ विरोधकांची बॅनरबाजीतून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 04:56 IST

‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’ अशा जाहिराती करीत राज्य सरकारने तीन वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचा दावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या या जाहिरातबाजीची हवा काढण्यासाठी ‘बॅनरबाजीचा’ आधार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’ अशा जाहिराती करीत राज्य सरकारने तीन वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचा दावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या या जाहिरातबाजीची हवा काढण्यासाठी ‘बॅनरबाजीचा’ आधार घेतला आहे. ‘हे न्हवं माझं सरकार’ या टॅगलाईनखाली गेल्या तीन वर्षातील सरकारच्या कामाचे वाभाडे काढणारे बॅनर्स विरोधकांनी झळकविले आहेत.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रविभवनातील कॉटेजच्या परिसरात एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी ठरले, याचा सचित्र आलेख मांडत सरकारला सवालही विचारण्यात आले आहेत. कर्जमाफी, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यासारखे मुद्दे घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर फोकस करण्यात आला आहे. सरकारच्या दाव्यांची खिल्लीही उडविण्यात आली आहे. सरकारने केलेली जाहिरातबाजी, सरकारच्या कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकºयांपर्यंत पोहचलेली नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यासह ‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाºयांना मिळते क्लीनचिट’ असे लिहून मंत्र्यांच्या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी विरोधक विधिमंडळावर जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानिमित्त शहरात लावण्यासाठी तयारकरण्यात आलेल्या बॅनरसंबंधित मुद्यांवर फोकस करण्यात आला आहे.बॅनरवरील काही मुद्देभाजपाने निवडणुकीत दिला होता नारा, अजूनही झाला नाही सातबारा कोरासरकारच्या अन्यायाचा झाला कहर, जगाचा पोशिंदा रोज पितो जहर

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार