शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
4
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
5
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
6
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
7
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
8
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
9
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
10
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
11
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
12
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
13
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
14
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
16
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
17
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
18
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
19
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
20
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का

चिमुकलीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; "माझ्या बाबांनी यंदा दिवाळीत फटाके अन् कपडे घेतले नाही, कारण..."

By प्रविण मरगळे | Updated: November 14, 2020 17:24 IST

CM Uddhav Thackeray News: आम्हाला दिवाळीत कपडे नाही, फटाके नाही, त्यामुळे आईला सांगितलं तर आई-बाबा दोघं भांडण करतात म्हणून नुकसानीचे पैसे बँकेत टाकावे अशी विनंती समिक्षा सावके हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

ठळक मुद्देमाझ्या बाबांनी यंदा दिवाळीत फटाके आणि कपडे घेतले नाहीया वर्षी आमच्या गावात पाऊसामुळे लय पाणी आलं. या पावसामुळे सोयाबीन कमी झालेहिंगोलीत नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता १५४ कोटींची गरज

हिंगोली – अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे गेल्या ५ महिन्यात जवळपास २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील जिरायती पिकांसह बागायत व फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी २२ ऑक्टोबरला शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला होता, मात्र दिवाळी आली तरी अद्यापही शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून अपेक्षेने पाहत आहेत.

यात समिक्षा सावके नावाच्या चिमुकलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलंय की, माझ्या बाबांनी यंदा दिवाळीत फटाके आणि कपडे घेतले नाही. या वर्षी आमच्या गावात पाऊसामुळे लय पाणी आलं. या पावसामुळे सोयाबीन कमी झाले, आपल्याकडे पैसे नाहीत असं बाबा म्हणाले तसं यावर्षी आपलं कर्जही माफ झालं नाही, उडीद खराब झाले असंही समिक्षाने पत्रात सांगितले आहे.

तसेच माझे बाबा रात्री वावरात पाणी पाजायला जातात. दिवाळी असल्याने त्यांना घरी राहा म्हंटले. पण दिवसा लाईट नाही असं बाबांनी सांगितले. मी आणि माझ्या भावाने बाबांना फटाके आणि कपडे घ्या म्हंटलं पण नुकसानीचे पैसे बँकेत आल्यावर घेऊ असं बाबांनी सांगितले. आम्हाला दिवाळीत कपडे नाही, फटाके नाही, त्यामुळे आईला सांगितलं तर आई-बाबा दोघं भांडण करतात म्हणून नुकसानीचे पैसे बँकेत टाकावे अशी विनंती समिक्षा सावके हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

हिंगोलीत नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ५१८ रुपये एवढ्या निधीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सतत कोसळलेल्या पावसामुळे मूग, उडीद आणि नंतर सोयाबीन, कापूस यासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतात उभ्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटण्याचा प्रकारही घडला. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण व पंचनामे करून जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्तांकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे.

दिवाळीपर्यंत पैसे देण्याचा होता सरकारचा दावा

निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकऱ्याना मदत देण्यात अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविलं होतं. परवानगी मिळाल्यानंतर दिवाळीपूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे मिळायला सुरूवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसल्याचं दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेfloodपूर