शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

माझी कृषी योजना : परंपरागत कृषी विकास योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:57 IST

शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली.

एका सर्वेक्षणानुसार जगभरात सुमारे २० लाख शेतकरी जैविक शेती करतात असे अनुमान आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात  जैविक शेती केली जाते. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले असून रासायनिक खते व कीटकनाशकांचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.

शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली. यानुसार रासायनिक व कीटकनाशकमुक्त अन्नधान्य उत्पादन वाढवून निर्यात करणे हा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करावा लागतो.  त्यांच्याकडे जैविक शेती करण्यासाठी किमान ५०  एकर शेतीक्षेत्रफळ असणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन वर्षांकरिता प्रती एकर २० हजार रुपये अनुदान दिले जाते. सदर रक्कम शेतकऱ्यांनी जैविक बीयाणे खरेदी पेरणी ते बाजारपेठेत शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी दिली जाते. तसेच देशाच्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात जैविक शेती केली जाते, त्या भागात शेतकऱ्यांच्या समूहाला पाहणी व अभ्यास दौऱ्याकरिता पाठविण्याची तरतूद आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी