शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

माझी कृषी योजना : हवामानावर फळ पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:41 IST

फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.

गारपीट, अवेळी पावसाचा तडाखा, वेगाचा वारा, तापमानाचा फटका आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या फळबागांना मोठा फटका बसतो. या धोक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकतेत घट येऊन आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामानाच्या धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी व शेतकऱ्यांना फळ पीक नुकसानभरपाई मिळावी याकरिता शासनाची पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही आधारवड आहे.

या योजनेत २०१७-१८ या वर्षात संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, द्राक्ष, लिंबू, केळी या पिकांचा समावेश होता. शासनाने जिल्हानिहाय वेगवेगळ्या फळ पिकांची निश्चिती करून सदर योजना लागू केली आहे. यावर्षी आंबा या पिकालाही १ जानेवारी २०१८ पासून संरक्षण देण्यात आले आहे; मात्र आंब्याचे क्षेत्र कोकणापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते.

यावर्षी प्रथमच कोकणाबाहेर विदर्भातील काही जिल्ह्यांमधील मंडळांचा यावर्षी प्रथमच समावेश करण्यात आला असून, १ जानेवारी २०१९ पासून आंबा फळ पिकाला संरक्षण प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांनी यासाठी बँकेत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक करण्यात आलेली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना