शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माझी कृषी योजना : शेतमालाचे आगीमुळे नुकसान झाल्यास भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:20 IST

आकस्मिकरीत्या आग लागून घर, शेती, पशुधनाची हानी झाल्यास किंवा विजेमुळे दुर्घटना होऊन आग लागल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.

आकस्मिकरीत्या आग लागून घर, शेती, पशुधनाची हानी झाल्यास किंवा विजेमुळे दुर्घटना होऊन आग लागल्यास शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून जातात. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत योजना राबविली जाते.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून नुकसानीच्या पन्नास टक्के किंवा ११ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम लाभार्थ्याला धनादेशाद्वारे दिली जाते. यासाठी जळीतग्रस्त शेतकऱ्यांचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेस सादर करावा लागतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांच्या शेती, घर किंवा पशुधनाचे नुकसान हे आकस्मितरीत्या आग लागून किंवा विजेमुळे झालेले असावे.

सातबारा उतारा, खातेउतारा, तहसीलदारांचा पंचनामा आदी कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व संबंधित योजनेचे काम पाहणारे कृषी अधिकारी यांचा प्रत्यक्षदर्शी स्थळ तपासणी दाखला सादर करावा. योजनेसाठी क्षेत्रमर्यादेची कोणतीही अट नसून सर्व घटकातील शेतकरी बांधवांना याचा लाभ घेता येतो. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना