शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

माझी कृषी योजना : बळीराजा जलसंजीवनी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:49 IST

योजनेनुसार विदर्भ व मराठवाडा या आत्महत्याग्रस्त विभागातील ८३ लघुपाटबंधारे प्रकल्पांसह ३ मोठे व मध्यम प्रकल्प आणि उत्तर महाराष्ट्रातील ३ व पश्चिम महाराष्ट्रातील २ प्रकल्पांचा समावेश आहे. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व अवर्षण प्रवण भागातील एकूण ११२ बांधकामाधीन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजना आणलेली आहे. शेतकऱ्यांना या योजनेनुसार प्रत्यक्ष शेतीसाठी अनुदान मिळत नसले तरी, अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प याद्वारे पूर्ण होणार आहेत. यामुळे ही योजना राबविली जात असलेल्या भागातील शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येणार आहे.

विशेष म्हणजे सिंचन क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निधीवर हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. या योजनेंतर्गत एकूण ९१ प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारकडून २५.७५ या प्रमाणानुसार अर्थसाहाय्य घोषित केलेले असून, केंद्र सरकारने राज्य शासनाला निधी उभारण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यास मान्यता दिलेली आहे.

या योजनेनुसार विदर्भ व मराठवाडा या आत्महत्याग्रस्त विभागातील ८३ लघुपाटबंधारे प्रकल्पांसह ३ मोठे व मध्यम प्रकल्प आणि उत्तर महाराष्ट्रातील ३ व पश्चिम महाराष्ट्रातील २ प्रकल्पांचा समावेश आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी