शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

जागा वाटपाची धुळवड रंगणार होळीनंतरच..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 07:16 IST

निवडणुकीच्या टप्प्यानुसार जागावाटप करायचे, असा पर्याय आता आला पुढे 

मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला आता होळी, धुळवडीनंतरच ठरेल, असे चित्र आहे. मुंबईत शनिवारी यासंदर्भात एकही बैठक झाली नाही. एकाचवेळी सर्व ४८ जागांचे वाटप करण्याऐवजी निवडणुकीच्या टप्प्यानुसार ते करायचे, असा पर्याय आता पुढे आला असून, त्याबाबत नेते लवकरच निर्णय घेणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या सर्व जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला एक-दोन दिवसांत ठरला नाही तरी फरक पडत नाही.  ॲड. प्रकाश आंबेडकर यांना अकोला व इतर काही जागा द्यायच्या असतील तर महाविकास आघाडीला लवकर निर्णय करावा लागेल. कारण, अकोल्यासह आठ जागांची निवडणूक २६ एप्रिलला होणार आहे.

आंबेडकर यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्याची आमची भूमिका असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. काँग्रेसकडून त्यांच्या कोट्यातील दोन आणि शिवसेना व राष्ट्रवादीकडून (शरद पवार) एकेक जागा आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ऑफर केल्या जातील, अशी माहिती आहे. 

आता सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागावाटप अडलेले आहे. सांगलीची जागा काँग्रेस व शिवसेनेलाही हवी आहे. भिवंडीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी दावेदार आहेत. सूत्रांनी सांगितले की, मुंबईत काँग्रेसला एकच जागा मिळेल. काँग्रेसने सध्या भाजपकडे असलेली उत्तर-पूर्व मुंबईची जागा लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी