शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुरूड दुर्घटना : महाविद्यालयावर कारवाई ?

By admin | Updated: August 29, 2016 03:45 IST

मुरूड दुर्घटनेत दगावलेल्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांच्या पालकांकडून महाविद्यालयावर कारवाईची मागणी केली जात आहे

पुणे : मुरूड दुर्घटनेत दगावलेल्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांच्या पालकांकडून महाविद्यालयावर कारवाईची मागणी केली जात आहे; मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला, तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून हालचाली होत नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे; मात्र अखेर विद्यापीठ प्रशासनाला कारवाईचा मुहूर्त सापडला असून, येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.विद्यापीठाशी संलग्न आबेदा इनामदार महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमावलीचे पालन करून सहलीचे आयोजन करणे आवश्यक होते; मात्र महाविद्यालयाने या नियमावलीचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, असा अरोप करून पीडित पालक व संघटनांनी महाविद्यालयावरील कारवाईसाठी आंदोलने केली. प्रथमत: महाविद्यालय प्रशासनाकडून दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली; मात्र त्यात विद्यार्थ्यांच्या चुकीमुळेच ही दुर्घटना घडल्याचे नमूद करण्यात आले. अधिवेधनातही याबाबत प्रश्न उपस्थित केला गेला. अखेर पालकांच्या दबावानंतर विद्यापीठाने या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली; परंतु समितीने अहवाल सादर करून सुमारे दोन महिने होत आले, तरीही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.यूजीसीच्या नियमावलीप्रमाणे सहलीस ५० पेक्षा जास्त विद्यार्थी जाणार असतील, तर बरोबर डॉक्टर असणे आवश्यक आहे. तसेच सहलीच्या स्थळाची पाहणी करणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्याच्या भरती-ओहोटीचा विचार करून विद्यार्थ्यांना पाण्यात जाण्यास परवानगी देणे गरजेचे होते; परंतु आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समितीने अहवालात नोंदविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.