शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

दोनशे रुपयांसाठी दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:54 AM

दोनशे रुपयांच्या वादातून दोघांचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचा प्रकार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील पुलाखाली घडला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तिसºया साथीदाराचा शोध घेऊन अटक केली आहे

नवी मुंबई : दोनशे रुपयांच्या वादातून दोघांचे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचा प्रकार ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील पुलाखाली घडला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तिसºया साथीदाराचा शोध घेऊन अटक केली आहे. तिघेही बिगारी कामगार असून मंगळवारी रात्री दारू पिण्यासाठी पुलाखाली जमले होते.ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील उड्डाण पुलाखाली दोघांचे मृतदेह आढळून आले होते. सकाळी ७.३०च्या सुमारास रहदारी सुरू झाली असता, काही पादचाºयांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, दोघांचेही डोके दगडाने ठेचून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, त्यांची ओळख पटली. बाळा उर्फ संदीप गायकवाड (२२) व समीर शेख (२०), अशी दोघा तरुणांची नावे असून ते तुर्भे परिसरातील झोपडपट्टीत राहणारे आहेत. तर घटनास्थळाची हद्द निश्चित झाल्यानंतर सानपाडा पोलीसठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शिवाय, या दुहेरी हत्याकांडाची उकल करण्याच्या अनुषंगाने परिमंडळ उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार सानपाडा व तुर्भेपोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. यादरम्यान मयत गायकवाड व शेख विषयी चौकशी करताना त्यांच्या प्रभाकर धोत्रे या तिसºया साथीदाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या शोधाकरिता पोलिसांनी झोपडपट्टी परिसर पिंजून काढला. त्यावेळी पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली.घटनेच्या दोन दिवस अगोदर दोनशे रुपयांवरून प्रभाकर धोत्रे याचे गायकवाड व शेख याच्यासोबत भांडण झाले होते. यामुळे दोघांचाही काटा काढण्याचे धोत्रे याने ठरवले होते. यानुसार मंगळवारी रात्री पुलाखाली एकत्र दारू पिल्यानंतर दोघे जण झोपले असता, धोत्रे याने त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.तिघेही बिगारी कामगार असून मंगळवारी रात्री दारू पिण्यासाठी पुलाखाली जमले होते. पोलिसांनी ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथील उड्डाण पुलाखाली पाहणी केली असता, दोघांचेही डोके दगडाने ठेचून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.