शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकांचा फड वर्षअखेरीस रंगणार

By admin | Updated: October 18, 2016 05:59 IST

महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार

मुंबई, ठाणे वगळता आचारसंहिता लागूमुंबई : महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे वगळता इतरत्र आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.राज्यातील १९२ नगरपालिका आणि २० नगरपंचायतींसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६५ शहरातील पालिकांचा समावेश असून नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या लहान शहारांचा कौल कोणाकडे, याबाबत उत्सुकता आहे.निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नगरपालिकांच्या अध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होईल. तसेच तेथे प्रभाग पद्धत असेल. त्यामुळे एक मतदार तीन ते चार (अध्यक्षांसह) मते देईल. नगर पंचायतींमध्ये मात्र वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असून तेथे नगरसेवकांमधून अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. एकूण ४,७५० जागांचा फैसला होणार आहे. पनवेल व नागभीड यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवडणूक होणार नाही. (विशेष प्रतिनिधी)>पुढील ८२ दिवस असतील आचारसंहितेचेपालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. त्यामुळे राज्य सरकारला मतदारांना प्रलोभन ठरेल असे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. पुढील ८२ दिवस आचारसंहितेचे असतील. चार किंवा त्यापेक्षा अधिक नगरपालिकांची निवडणूक असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्हाभर आचारसंहिता असेल. तीन किंवा त्यापेक्षा कमी नगरपालिकांमध्ये निवडणूक असलेल्या जिल्ह्यात केवळ त्या नगरपालिका क्षेत्रापुरतीच आचारसंहिता असेल. सर्व ठिकाणची आचारसंहिता निकालानंतर संपुष्टात येईल. >अशी होणार निवडणूकनिवडणूक होत नगरपालिका/ उमेदवारी अर्ज मतदानाची मतमोजणीअसलेले जिल्हे नगरपंचायती भरण्याचा कालावधीतारीखतारीख२५ जिल्हे १४७ नगरपालिका २४ ते २९ आॅक्टोबर २७ नोव्हेंबर २८ नोव्हेंबर१८ नगरपंचायती२ जिल्हे १४ नगरपालिका ११ ते १९ नोव्हेंबर १४ डिसेंबर १५ डिसेंबर४ जिल्हे २० नगरपालिका२ नगरपंचायती १९ ते २५ नोव्हेंबर १८ डिसेंबर १९ डिसेंबर२ जिल्हे ११ नगरापलिका ९ ते १७ डिसेंबर ८ जाने. १७ ९ जानेवारीराखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती उमेदवारी अर्जासोबत सादर करण्याची मूभा असेल. अशा उमेदवारांना निवडून निकालाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल.