शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

नगरपालिकांचा फड वर्षअखेरीस रंगणार

By admin | Updated: October 18, 2016 05:59 IST

महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार

मुंबई, ठाणे वगळता आचारसंहिता लागूमुंबई : महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे वगळता इतरत्र आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.राज्यातील १९२ नगरपालिका आणि २० नगरपंचायतींसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६५ शहरातील पालिकांचा समावेश असून नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या लहान शहारांचा कौल कोणाकडे, याबाबत उत्सुकता आहे.निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नगरपालिकांच्या अध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होईल. तसेच तेथे प्रभाग पद्धत असेल. त्यामुळे एक मतदार तीन ते चार (अध्यक्षांसह) मते देईल. नगर पंचायतींमध्ये मात्र वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असून तेथे नगरसेवकांमधून अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. एकूण ४,७५० जागांचा फैसला होणार आहे. पनवेल व नागभीड यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवडणूक होणार नाही. (विशेष प्रतिनिधी)>पुढील ८२ दिवस असतील आचारसंहितेचेपालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. त्यामुळे राज्य सरकारला मतदारांना प्रलोभन ठरेल असे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. पुढील ८२ दिवस आचारसंहितेचे असतील. चार किंवा त्यापेक्षा अधिक नगरपालिकांची निवडणूक असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्हाभर आचारसंहिता असेल. तीन किंवा त्यापेक्षा कमी नगरपालिकांमध्ये निवडणूक असलेल्या जिल्ह्यात केवळ त्या नगरपालिका क्षेत्रापुरतीच आचारसंहिता असेल. सर्व ठिकाणची आचारसंहिता निकालानंतर संपुष्टात येईल. >अशी होणार निवडणूकनिवडणूक होत नगरपालिका/ उमेदवारी अर्ज मतदानाची मतमोजणीअसलेले जिल्हे नगरपंचायती भरण्याचा कालावधीतारीखतारीख२५ जिल्हे १४७ नगरपालिका २४ ते २९ आॅक्टोबर २७ नोव्हेंबर २८ नोव्हेंबर१८ नगरपंचायती२ जिल्हे १४ नगरपालिका ११ ते १९ नोव्हेंबर १४ डिसेंबर १५ डिसेंबर४ जिल्हे २० नगरपालिका२ नगरपंचायती १९ ते २५ नोव्हेंबर १८ डिसेंबर १९ डिसेंबर२ जिल्हे ११ नगरापलिका ९ ते १७ डिसेंबर ८ जाने. १७ ९ जानेवारीराखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती उमेदवारी अर्जासोबत सादर करण्याची मूभा असेल. अशा उमेदवारांना निवडून निकालाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल.