शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी जागवल्या मुंडेंच्या आठवणी

By admin | Updated: June 4, 2014 00:32 IST

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी एके काळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना पदभार वाहिलेल्या गृह खात्यातील माजी अधिकार्‍यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.

डिप्पी वांकाणी/मुंबई : केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी एके काळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना पदभार वाहिलेल्या गृह खात्यातील माजी अधिकार्‍यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. अनेकांनी त्यांचे वर्णन कायम समस्यांवर उपाय सुचवणारे, जनतेच्या आणि पोलिसांच्या प्रश्नांत सारखाच रस घेणारे आणि कधीही भेटता येऊ शकतील असे मंत्री म्हणून केले. मुंडे यांच्या कार्यकाळात राज्याचे पोलीस महासंचालक असलेले अरविंद इनामदार यांनी सांगितले की, मुंडे यांची स्मरणशक्ती अफाट होती आणि एखादी गोष्ट ते क्वचित विसरत. त्यांच्याशी अनेक महिन्यांपूर्वी झालेल्या चर्चेचे संदर्भ ते सहज देत. ते नेहमी आमच्यासाठी उपलब्ध असत. नक्षलवाद असो, अंडरवर्ल्ड असो किंवा दहशतवाद, त्यांची विषयाची जाण उत्तम होती. त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेलो की ते सदैव हसतमुखाने त्यावर उपाय सांगण्यास तयार असायचे. इनामदार यांनी असेही सांगितले की, मुंडेंना पोलिसांच्या खडतर आयुष्याची जाण होती आणि ते पोलिसांच्या हितासाठी आणि पोलीस दलासाठी अधिक परिश्रम घेण्यास तयार असलेले मंत्री म्हणून आठवणीत राहतील. सध्या ही पद्धत वापरात नसली तरी मुंडे यांनीच इन्स्पेक्टर आणि तहसिलदार हे हुद्दे समकक्ष बनवले. त्यांनी पोलीस दलात २२,००० नव्या पदांच्या भरतीला मान्यता दिली. त्यामुळे कित्येक कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर्सना पदोन्नतीची संधी मिळाली. मुंडे कायम मुले आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल संवेदनशील होते. त्यांनी कॉन्स्टेबल्सना अधिका-यांसारख्याच टोप्या देण्याची योजना मांडली होती. पण ती अस्तित्वात येऊ शकली नाही. मुंडे यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार असताना मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले आर. डी. त्यागी म्हणाले, मुंडे यांनी त्यांना आणि पोलीसांना कामात नेहमीच मोकळीक दिली. त्यांना काम पूर्ण होण्यात स्वारस्य असे. पण दैनंदिन व्यवहारात कधीही ढवळाढवळ केली नाही. त्यांच्या काळात शहरात क्वचितच दंगली किंवा गँगवॉरच्या घटना घडल्या. त्यांच्या कार्यकाळात पोलीस दलाची कामगिरी उत्तम होती.