शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे पाटणा केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 05:49 IST

शिवसेनेने २० वर्षांत मुंबईचे रूपांतर पाटण्यात करून टाकले, अशी घणाघाती टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेने २० वर्षांत मुंबईचे रूपांतर पाटण्यात करून टाकले, अशी घणाघाती टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. महापालिकेतील भ्रष्टाचारावरून माध्यमांचे लक्ष हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने वल्गना केल्या जात आहेत, आव्हानाची भाषा वापरली जात आहे. मात्र, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही पारदर्शक कारभाराचा मुद्दा मांडणार आणि तुमचा भ्रष्टाचार काढत राहणार. आमची विकासकामे सांगणार आणि तुम्ही काय विकास केला हे विचारत राहणार, असेही त्यांनी सुनावले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुलुंड येथील आपल्या पहिल्यावहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. या वेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह स्थानिक आमदार आणि पालिका उमेदवार उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या हवाल्याने मुंबई पारदर्शक कारभारात प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. मात्र, हा अहवाल वाचण्याची तसदीही शिवसेनेने घेतली नाही. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात हैदराबाद आणि बेंगळुरूनंतर मुंबई महापालिकेचा क्रमांक लागतो. हा तिसरा क्रमांकसुद्धा राज्य सरकारमुळे मिळाला आहे. महापालिकेसंदर्भात राज्य सरकारने जे चार अहवाल सादर केले त्यात पैकीच्या पैकी गुण मिळाले. पात्र, पालिकेच्या ८ पैकी ५ निकषांत यांना भोपळाही फोडता आला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सल्लागारांनी अहवाल अर्धवट वाचला. सल्लागारांच्या अपुऱ्या माहितीमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला. मागील वर्षाचा कार्यअहवाल सादर करणे, वॉर्डनिहाय वित्तीय मागणीचा अहवाल, वर्षभरातील नागरी कामांची आकडेवारी, माहितीच्या अधिकारात आमसभेचे निर्णय कळविणे आणि पालिका अर्थसंकल्पात जनसहभाग या पाचही निकषांत पालिकेला शून्य गुण मिळाले आहेत. मग कशाच्या आधारावर पारदर्शक कारभाराचे होर्डिंग लावता असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. वॉर्ड कमिटी नेमणे, जनजागृती अशा निकषांत मुंबई पालिकेने गुण मिळविले आहेत. वॉर्ड कमिट्या नेमून पालिकेने असा कोणता तीर मारला. केंद्र सरकारच्या अहवालाचा नीट अभ्यास केला असता तर राज्य सरकारमुळेच तुमची इज्जत वाचली हे लक्षात आले असते, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव केली.मुंबई पालिकेतील टेंडरचे मूल्यमापन केले असते तर यांचा शेवटचा क्रमांक आला असता आणि मुंबईची बदनामी झाली असती. राज्य सरकारने कोस्टल रोडची परवानगी रखडवल्याचा आरोप केला गेला. त्यावरही उत्तर आहे, पण सगळेच आज उघड करणार नाही. कोस्टल रोडबाबत पुढच्या सभेत बोलेन. सात वर्षे शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिकेच्या कामकाजाचा अंतर्गत लेखा अहवालच तयार होऊ दिला नाही. स्थायी समितीत ही अडवणूक करण्यात आली. आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. निवडणुकीत टीआरपीचा कलगीतुरा करण्यासाठी आलो नाही. ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है; वही होता है जो मंजुर ए खुदा होता है!, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्ध्व ठाकरे यांना फटकारले.रामदास आठवले यांची कविता मुंबई में हार जाएगी शिवसेना, क्योंकी भाजप के साथ आयी है भीमसेना... तसेच हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना... अशा कविता रामदास आठवले यांनी सभेत ऐकविल्या....तर राजकारण सोडेन - उद्धव ठाकरेमुंबईचे पाटणा झाले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह पाटण्याचाही अपमान केला आहे. मुंबई आणि पाटण्याची तुलना करा, तशी ती झालीच तर मी राजकारण सोडेन. पण, मात्र, मुंबईचे पाटणा झाल्याचे ठरले नाही तर तुम्ही मुंबई सोडा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. मुंबई महापालिका पारदर्शकतेत देशात अव्वलच आहे, तसा अहवाल केंद्र सरकारनेच दिला आहे. केंद्रातून मुंबईचे कौतुक करणारे गाढव आहेत का, असा प्रश्न विचारतानाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची अर्धवटराव अशी संभावना केली.