शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मुंबईचे किमान तापमान १६ अंशांवर स्थिर, विदर्भाला थंडीच्या लाटेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:21 IST

समुद्राहून वाहणारे वारे, वा-याची बदलती दिशा, ढगाळ हवामान आणि उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहणारे शीत वारे; वातावरणातील या प्रमुख घटकांमधील चढउतारामुळे राज्यासह मुंबईतला थंडीचा कडाका कायम आहे.

मुंबई : समुद्राहून वाहणारे वारे, वाºयाची बदलती दिशा, ढगाळ हवामान आणि उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहणारे शीत वारे; वातावरणातील या प्रमुख घटकांमधील चढउतारामुळे राज्यासह मुंबईतला थंडीचा कडाका कायम आहे. राज्यासह मुंबई थंडीने गारठली असतानाच मंगळवारी विदर्भात थंडीची लाट येईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान १६ अंशांवर स्थिर राहिल्याने मुंबईतला गारवाही कायम असून, मंगळवारसह बुधवारीही मुंबईचे किमान तापमान १७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईतला थंडीचा कडाका कायम राहणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट होती. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे.मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २ फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमुंबई १६भिरा १५पुणे ११.५अहमदनगर १०.१जळगाव ९महाबळेश्वर १४.६मालेगाव १२.४नाशिक ९.९सांगली १५.३सातारा १२.९उस्मानाबाद १२.९औरंगाबाद १२.६परभणी ११नांदेड १४.५अकोला १२.५अमरावती १४चंद्रपूर १३.२गोंदिया ८नागपूर ९.३वाशिम १०.६यवतमाळ १३.४ 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र