शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काँग्रेसच्या काळातच मुंबईचा विकास

By admin | Updated: February 13, 2017 03:53 IST

जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली

मुंबई : जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मात्र, वीस वर्षे पालिकेत सत्ता गाजविणाऱ्या शिवसेना-भाजपाला मुंबईसाठी साध्या मूलभूत सोईसुविधा पुरवता आल्या नाहीत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी केली. रविवारी मुंबई काँग्रेसतर्फे अंधेरी येथील रहेजा आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी आदी नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, मुंबई हे देशाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या शहरांपैकी एक शहर आहे आणि इथे चांगले रस्ते नाहीत, रेल्वेची चांगली सुविधा नाहीत. महापालिकेकडून, सरकारकडून सामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात, त्याही मुंबईत मिळत नाहीत. गेल्या वीस वर्षांमध्ये महापालिकेच्या सत्तेवर असणारे सामान्य जनतेला चांगले रस्ते, चांगली दळणवळणाची साधने का देऊ शकले नाहीत, असा आरोप चिदंबरम यांनी केला. जो देश अंतराळात यान पाठवतो. इतके प्रगत तंत्रज्ञान ज्या देशात आहे, अशा देशातील मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात उच्च दर्जाची रेल्वे व्यवस्था लोकांना मिळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. सध्या मुंबईचा स्तर इतर शहरांच्या तुलनेत घसरत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांना महापालिकेची सत्ता देण्यापेक्षा मुंबईच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरत चालला आहे. देशाचा विकासदर २०१६-१७ मध्ये ७.९ टक्क््यांवरून ६.६ टक्क्यांवर घसरला आहे. आगामी काळात आणखी त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. हा नोटाबंदीचा परिणाम आहे. या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक व सामान्य जनतेला फार हाल सहन करावे लागले. लोकांचा बँकांवरून विश्वास उडाला आहे. सध्या जो अर्थसंकल्प सादर केला गेला, त्यातही मध्यमवर्गीय, तसेच छोट्या व्यावसायिकांसाठी काहीही दिलासा देण्यात आली नसल्याची टीका चिदंबरम यांनी केली. (प्रतिनिधी)