शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

काँग्रेसच्या काळातच मुंबईचा विकास

By admin | Updated: February 13, 2017 03:53 IST

जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली

मुंबई : जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मात्र, वीस वर्षे पालिकेत सत्ता गाजविणाऱ्या शिवसेना-भाजपाला मुंबईसाठी साध्या मूलभूत सोईसुविधा पुरवता आल्या नाहीत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी केली. रविवारी मुंबई काँग्रेसतर्फे अंधेरी येथील रहेजा आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी आदी नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, मुंबई हे देशाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या शहरांपैकी एक शहर आहे आणि इथे चांगले रस्ते नाहीत, रेल्वेची चांगली सुविधा नाहीत. महापालिकेकडून, सरकारकडून सामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात, त्याही मुंबईत मिळत नाहीत. गेल्या वीस वर्षांमध्ये महापालिकेच्या सत्तेवर असणारे सामान्य जनतेला चांगले रस्ते, चांगली दळणवळणाची साधने का देऊ शकले नाहीत, असा आरोप चिदंबरम यांनी केला. जो देश अंतराळात यान पाठवतो. इतके प्रगत तंत्रज्ञान ज्या देशात आहे, अशा देशातील मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात उच्च दर्जाची रेल्वे व्यवस्था लोकांना मिळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. सध्या मुंबईचा स्तर इतर शहरांच्या तुलनेत घसरत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांना महापालिकेची सत्ता देण्यापेक्षा मुंबईच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरत चालला आहे. देशाचा विकासदर २०१६-१७ मध्ये ७.९ टक्क््यांवरून ६.६ टक्क्यांवर घसरला आहे. आगामी काळात आणखी त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. हा नोटाबंदीचा परिणाम आहे. या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक व सामान्य जनतेला फार हाल सहन करावे लागले. लोकांचा बँकांवरून विश्वास उडाला आहे. सध्या जो अर्थसंकल्प सादर केला गेला, त्यातही मध्यमवर्गीय, तसेच छोट्या व्यावसायिकांसाठी काहीही दिलासा देण्यात आली नसल्याची टीका चिदंबरम यांनी केली. (प्रतिनिधी)