शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या काळातच मुंबईचा विकास

By admin | Updated: February 13, 2017 03:53 IST

जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली

मुंबई : जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मात्र, वीस वर्षे पालिकेत सत्ता गाजविणाऱ्या शिवसेना-भाजपाला मुंबईसाठी साध्या मूलभूत सोईसुविधा पुरवता आल्या नाहीत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी केली. रविवारी मुंबई काँग्रेसतर्फे अंधेरी येथील रहेजा आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी आदी नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, मुंबई हे देशाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या शहरांपैकी एक शहर आहे आणि इथे चांगले रस्ते नाहीत, रेल्वेची चांगली सुविधा नाहीत. महापालिकेकडून, सरकारकडून सामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात, त्याही मुंबईत मिळत नाहीत. गेल्या वीस वर्षांमध्ये महापालिकेच्या सत्तेवर असणारे सामान्य जनतेला चांगले रस्ते, चांगली दळणवळणाची साधने का देऊ शकले नाहीत, असा आरोप चिदंबरम यांनी केला. जो देश अंतराळात यान पाठवतो. इतके प्रगत तंत्रज्ञान ज्या देशात आहे, अशा देशातील मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात उच्च दर्जाची रेल्वे व्यवस्था लोकांना मिळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. सध्या मुंबईचा स्तर इतर शहरांच्या तुलनेत घसरत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांना महापालिकेची सत्ता देण्यापेक्षा मुंबईच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरत चालला आहे. देशाचा विकासदर २०१६-१७ मध्ये ७.९ टक्क््यांवरून ६.६ टक्क्यांवर घसरला आहे. आगामी काळात आणखी त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. हा नोटाबंदीचा परिणाम आहे. या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक व सामान्य जनतेला फार हाल सहन करावे लागले. लोकांचा बँकांवरून विश्वास उडाला आहे. सध्या जो अर्थसंकल्प सादर केला गेला, त्यातही मध्यमवर्गीय, तसेच छोट्या व्यावसायिकांसाठी काहीही दिलासा देण्यात आली नसल्याची टीका चिदंबरम यांनी केली. (प्रतिनिधी)