शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मुंबईकरांचे ‘मेघा’हाल, रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत, मुंबई 'ऑफ द ट्रॅक'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:04 IST

मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच ...

मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच जोर धरला. दुपारपासूनच मध्य रेल्वेची जलद वाहतूक वगळता धिम्या मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे विलंबाने सुरू होती. दरम्यान, पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढू लागला आणि विलंबाने धावू लागलेल्या लोकलमुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली.पावसामुळे रेल्वे वाहतुकीप्रमाणेच रस्ते वाहतुकीलाही ब्रेक लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमातासह सखल भागात पावसाचे पाणी साचले. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील शीतल आणि कमानी सिग्नल येथील सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे मुंबईकरांना घर गाठणे कठीण झाले.सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह कुर्ला-अंधेरी मार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मरोळसह अंधेरी येथे वाहतूक कोंडी झाली होती. दादरसह माहीम आणि लोअर परळ येथेही वाहतूक कोंडी झाली होती. महालक्ष्मी येथेही वाहतूक कोंडी झाली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने वाहनांचा वेग कमी झाला होता. वाढत्या वाहतूक कोंडीने मुंबईकरांच्या मनस्तापात भर पडली.>रांगा वाहनांच्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता येथे पाणी साचले. यासह मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक सखल ठिकाणे पाण्याखाली गेली होती. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांबरांगा लागल्या होत्या. ठिकठिकाणची वाहतूक कोंडी आणि साचलेले पाणी यातून मार्ग काढताना मुंबईकरांची चांगलीच दमछाक झाली.शिवसेना भवनाजवळील हॉटेल मनोहर येथील झाड कोसळल्याने शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. विमानांची उड्डाणे सरासरी२० मिनिटे उशिराने होती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे अनेक प्रवाशांनी मेट्रोकडे धाव घेतली. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या स्थानकांवरही प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र होते.