शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुंबईकरांचे ‘मेघा’हाल, रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत, मुंबई 'ऑफ द ट्रॅक'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:04 IST

मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच ...

मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच जोर धरला. दुपारपासूनच मध्य रेल्वेची जलद वाहतूक वगळता धिम्या मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे विलंबाने सुरू होती. दरम्यान, पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढू लागला आणि विलंबाने धावू लागलेल्या लोकलमुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली.पावसामुळे रेल्वे वाहतुकीप्रमाणेच रस्ते वाहतुकीलाही ब्रेक लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमातासह सखल भागात पावसाचे पाणी साचले. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील शीतल आणि कमानी सिग्नल येथील सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे मुंबईकरांना घर गाठणे कठीण झाले.सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह कुर्ला-अंधेरी मार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मरोळसह अंधेरी येथे वाहतूक कोंडी झाली होती. दादरसह माहीम आणि लोअर परळ येथेही वाहतूक कोंडी झाली होती. महालक्ष्मी येथेही वाहतूक कोंडी झाली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने वाहनांचा वेग कमी झाला होता. वाढत्या वाहतूक कोंडीने मुंबईकरांच्या मनस्तापात भर पडली.>रांगा वाहनांच्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता येथे पाणी साचले. यासह मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक सखल ठिकाणे पाण्याखाली गेली होती. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांबरांगा लागल्या होत्या. ठिकठिकाणची वाहतूक कोंडी आणि साचलेले पाणी यातून मार्ग काढताना मुंबईकरांची चांगलीच दमछाक झाली.शिवसेना भवनाजवळील हॉटेल मनोहर येथील झाड कोसळल्याने शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. विमानांची उड्डाणे सरासरी२० मिनिटे उशिराने होती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे अनेक प्रवाशांनी मेट्रोकडे धाव घेतली. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या स्थानकांवरही प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र होते.