शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांचे ‘मेघा’हाल, रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत, मुंबई 'ऑफ द ट्रॅक'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:04 IST

मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच ...

मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच जोर धरला. दुपारपासूनच मध्य रेल्वेची जलद वाहतूक वगळता धिम्या मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे विलंबाने सुरू होती. दरम्यान, पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढू लागला आणि विलंबाने धावू लागलेल्या लोकलमुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली.पावसामुळे रेल्वे वाहतुकीप्रमाणेच रस्ते वाहतुकीलाही ब्रेक लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमातासह सखल भागात पावसाचे पाणी साचले. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील शीतल आणि कमानी सिग्नल येथील सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे मुंबईकरांना घर गाठणे कठीण झाले.सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह कुर्ला-अंधेरी मार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मरोळसह अंधेरी येथे वाहतूक कोंडी झाली होती. दादरसह माहीम आणि लोअर परळ येथेही वाहतूक कोंडी झाली होती. महालक्ष्मी येथेही वाहतूक कोंडी झाली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने वाहनांचा वेग कमी झाला होता. वाढत्या वाहतूक कोंडीने मुंबईकरांच्या मनस्तापात भर पडली.>रांगा वाहनांच्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता येथे पाणी साचले. यासह मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक सखल ठिकाणे पाण्याखाली गेली होती. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांबरांगा लागल्या होत्या. ठिकठिकाणची वाहतूक कोंडी आणि साचलेले पाणी यातून मार्ग काढताना मुंबईकरांची चांगलीच दमछाक झाली.शिवसेना भवनाजवळील हॉटेल मनोहर येथील झाड कोसळल्याने शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. विमानांची उड्डाणे सरासरी२० मिनिटे उशिराने होती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे अनेक प्रवाशांनी मेट्रोकडे धाव घेतली. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या स्थानकांवरही प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र होते.