शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मुंबई जागतिक दर्जाचे बनविणार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 2, 2014 05:16 IST

दिल्लीत पडून असलेल्या मुंबईच्या प्रश्नांची सोडवणूक करून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवू, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला

मुंबई : दिल्लीत पडून असलेल्या मुंबईच्या प्रश्नांची सोडवणूक करून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवू, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचा विजय साजरा करण्यासाठी अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या १८ तसेच भाजपाच्या तीन खासदारांचा सत्कार करण्यात आला. मुंबईचे अनेक प्रश्न दिल्लीत प्रलंबित आहेत. सागरी मार्ग, सिंचनाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. आता केंद्रात सत्ता आल्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे ठाकरेंनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन झाले. मात्र त्यांचे स्वप्न अजून साकार झालेले नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवून त्यांचे आशीर्वाद मिळवा. त्यांच्या आशीर्वादाची ताकद दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेच्या विजयात युवा सेनेचाही मोठा वाटा होता, असेही त्यांनी नमूद केले. संतांना साजेसे वर्तन ठेवा, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, असा सल्ला त्यांनी नव्या खासदारांना दिला. कार्यक्रमात अनेक मराठी कलाकार सहभागी झाले होते. आदेश बांदेकर, गिरीश ओक, पल्लवी जोशी, अमोल कोल्हे, तुषार दळवी यांनी सूत्रसंचालन केले.