शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबईला पावसाने झोडपले

By admin | Updated: June 25, 2016 03:32 IST

मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले

मुंबई : मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने काही काळ घेतलेली विश्रांती वगळता सायंकाळपर्यंत पडलेल्या मुसळधार सरींमुळे हिंदमाता, परळ टीटी, कुर्ला पश्चिमेकडील कमानी आणि शीतल सिग्नलसह उर्वरित सखल ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. परिणामी रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच जोरदार पावसामुळे हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल १० मिनिटे विलंबाने धावत होत्या. पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत मुंबई शहरात विशेषत: दक्षिण मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. मरिन ड्राइव्ह, कुलाबा, फोर्ट, मस्जीद बंदर, भायखळा, वरळी, लालबाग आणि दादर येथे दुपारी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. तर पूर्व उपनगरांतही दुपारी कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, भांडुपसह मुलुंड येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पश्चिम उपनगरांत अंधेरी, बोरीवलीसह जोगेश्वरी येथेही बरसलेल्या पावसाने मुंबईकरांची धावपळ उडाली. मुंबई शहरात पडलेल्या मुसळधार सरींमुळे हिंदमाता, परळ टीटी येथील सखल भागात पाणी साचले. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून मॅनहोलची झाकणे उघडण्यात आली होती. शिवाय आवश्यक मनुष्यबळही तैनात करण्यात आले होते. तर कुर्ला पश्चिमेकडील शीतल आणि कमानी सिग्नल या सखल ठिकाणीही पावसाचे पाणी साचले होते. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मोहम्मद अली रोड, भायखळा, दादर आणि सायन व लाल बहादूर शास्त्री मार्गावर सायन सर्कल, कुर्ला डेपो, कमानी सिग्नल आणि श्रेयस सिनेमा येथील वाहतुकीचा वेग मंदावला होता.तलावांमध्ये पाऊस नाहीच; पाणीकपात कायमगुरुवार रात्रीपासून मुंबईत पावसाने चांगला जोर धरला आहे़ मात्र प्रमुख तलावांच्या क्षेत्राकडे आजही पावसाने पाठ फिरवली आहे़ त्यामुळे तलावांची पातळी खालावत असून राखीव साठ्यावरच पालिकेची मदार आहे़ परिणामी पावसाळ्यातही मुंबईकरांना पाणीकपातीची झळ सहन करावी लागणार आहे़विलंबाने मुंबईत दाखल झालेल्या पावसाने तलाव क्षेत्रांमध्ये मात्र हजेरी लावलेली नाही़ मुंबईत असलेले विहार व तुळशी तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे़ त्याचवेळी पावसाअभावी भातसा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा कोरडेच आहेत़ तर अपर वैतरणा तलाव पाण्याच्या किमान पातळीपेक्षाही खालावला आहे़ त्यामुळे पाणीसंकट आणखी वाढत चालले आहे़ भातसा, मोडक सागर आणि तानसा या तलावांची याहून वेगळी स्थिती नाही़ त्यामुळे आॅगस्ट महिन्यापासून सुरू असलेली २० टक्के पाणीकपात आणखी काही काळ कायम राहील, असे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले़ तूर्तास राखीव साठ्यामुळे जुलै महिना सरेल, असा पालिकेचा दावा आहे़ (प्रतिनिधी)झाडे पडण्याच्या तक्रारी शहरात ४, पूर्व उपनगरांत ५ आणि पश्चिम उपनगरांत १० अशा एकूण १९ ठिकाणी झाडे पडली.शॉर्टसर्किट : शहरात ५, पूर्व उपनगरांत १ अशा एकूण ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.वाहतूक खोळंबली हिंदमाता येथे पाणी साचल्याने काही कालावधीकरिता येथील वाहतूक फ्लायओव्हरवरून वळवण्यात आली होती. ही वाहतूक सायंकाळी ४.३० वाजता पूर्ववत करण्यात आली.भिंती पडल्यापूर्व उपनगरांत २, पश्चिम उपनगरांत १ अशा एकूण ३ ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.हवामान अंदाज कुलाबा वेधशाळेने येत्या २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविला आहे.पाणीसंकट कायम भातसा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा कोरडेच आहेत़, तर अपर वैतरणा तलाव पाण्याच्या किमान पातळीपेक्षाही खालावला आहे़ त्यामुळे पाणीसंकट आणखी वाढत चालले आहे़ दोन्ही परिचारिकांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यापैकी एका परिचारिकेच्या हाताला लागले आहे. दोघींवरही तत्काळ रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. प्रकृती गंभीर नसल्यामुळे वॉर्डमध्येच त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. परिचारिकांच्या कार्यालयातील प्लॅस्टर पडलेला असून, स्लॅब कोसळलेला नाही. - डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय