शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

मुंबईमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:39 IST

दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला...

मुंबई : दिवाळी म्हणजे दीपोत्सव, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण आता हळूहळू बदलत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण लक्षात घेऊन फटाके उडवण्याविरोधात झालेल्या आवाहनांना मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून फटाके वाजवण्याचे प्रमाण यावर्षी खूपच कमी झाल्याचे नरक चतुर्दशीच्या दिवशी निदर्शनास आले आहे. पर्यावरणप्रेमी आणि शासनाच्या पुढाकाराने राबविलेल्या जनजागृती मोहिमेला यश मिळाल्याची भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.लहान मुलांना आणि तरुणांना फटाक्यांचे मोठे आकर्षण असते. फटाके वाजवणाºयांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शाळांमधूनच फटाक्यांबाबत जनजागृती केली जाते. सरसकट सर्वच शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.यंदा फटाक्यांची दुकाने संख्येने खूपच कमी आहेत. दादरमध्ये मागील वर्षी फटाक्यांची सात ते आठ दुकान होती. यंदा मात्र त्याच दादर मार्केटमध्ये फटाक्याची फक्त दोन दुकाने पाहायला मिळाली व फटाक्यांचा एकही स्टॉल नव्हता.पालिकेकडून फटाक्यांच्या दुकानांसाठीच्या परवान्यांसाठीच्या विविध नियमांची कडक अंमलबजावणी केल्याने यंदा फटाक्यांची दुकाने कमी असल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :fire crackerफटाकेdiwaliदिवाळीMumbaiमुंबई