शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 17:12 IST

Corona Vaccine: लसीकरण मोहिमेवरून मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेसह केंद्र सरकारला फटकारले आहे.

ठळक मुद्देमुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशाहायकोर्टानं केंद्रालाही चांगलंच सुनावलंहायकोर्टाचे केंद्र सरकारला अनेक प्रश्न

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरण हाच उत्तम मार्ग असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मुंबईउच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेसह केंद्र सरकारला चांगलेच फटकारले आहे. (mumbai high court slams bmc and centre govt over corona vaccination)

घरोघरी लसीकरण करण्यास मुंबई महापालिकेने नकार दिला आहे. केंद्र सरकार सांगेल, त्याप्रमाणेच लसीकरण करू, अशी भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मांडली आहे. महापालिकेच्या या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेला फटकारले आहे. आम्ही आमच्या आदेशाने तुम्हाला घरोघरी लसीकरण करण्यास परवानगी देण्याचे संकेत दिले. असे असतानाही तुम्ही त्या संधीचा लाभ घेत नाही. मुंबई महापालिकेने अशी भूमिका का घेतली? आम्ही अत्यंत निराश झालो आहोत, असे म्हणत खंडपीठाने मुंबई महापालिकेच्या भूमिकेवर खंत व्यक्त केली. 

‘ब्लॅक फंगस’चा साथरोग कायद्यात समावेश करावा; केंद्राची नवी नियमावली

केंद्र सरकारचेही कान टोचले

आजच्या घडीला अशी परिस्थिती की, लोकांना लस मिळण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. याशिवाय काही घटनांमध्ये ऑनलाइन बुकिंग करूनही केंद्रावर गेल्यानंतर तुटवड्यामुळे लोकांना पुन्हा घरी जावे लागत आहे. हे काय सुरू आहे? खरे तर लोकांनी अशी धावाधाव करण्यापेक्षा तुम्ही म्हणजे सरकारने लोकांकडे धाव घेऊन त्यांना लस देण्याचे काम करायला हवे होते, असे सांगत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. 

“ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”

उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला अनेक प्रश्न

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली. केंद्र सरकारने लसीकरणाबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर हायकोर्टाने सरकारला अनेक प्रश्न विचारत चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे. लस दिल्यानंतर लगेच एखाद्यावर काही तरी साईड इफेक्ट झाला, प्रकृतीवर परिणाम झाला, याची तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का? काही तपशील आहे का? आता सरकारकडे लसीकरणाचाही भरपूर अनुभव जमा झाला असेल. इंग्लंडसारख्या देशात घरोघरी होत असेल तर तिथली लस आणि आपली लस यात खूप फरक आहे का? मग याचा केंद्र सरकार का विचार करत नाही?, असे काही प्रश्न उच्च न्यायालयाने यावेळी उपस्थित केले. यासंदर्भातील सुनावणी आता २ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार