शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

मुंबईत भाजपाचा परप्रांतीय नेत्यांवर भर

By admin | Updated: October 12, 2014 02:46 IST

मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील परप्रांतीय मते भाजपाकडे पक्षाने आखली आहे. शिवसेनेसोबतची गेल्या 25 वर्षाची युती भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशावरून तोडली.

मुंबई : मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील परप्रांतीय मते भाजपाकडे पक्षाने आखली आहे. शिवसेनेसोबतची गेल्या 25 वर्षाची युती भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशावरून तोडली. अमित शहा यांना मुंबईवर कब्जा करायचा असल्याने भाजपाने हे कृत्य केले, असा प्रचार सुरु आहे. त्याचा मराठी माणसावर किती प्रभाव पडला आहे याचा भाजपाला अंदाज येत नसल्याने परप्रांतातून नेते आणून त्यांना प्रचारात उतरवण्याचा सपाटा लावला आहे. वसुंधराराजे सिंधिया, आनंदीबेन पटेल, सुषमा स्वराज, येड्डीयुरप्पा, मनोहर र्पीकर, सुशील मोदी असे नेते सध्या मुंबई व परिसरात प्रचार करीत आहेत. वसुंधराराजे मारवाडी, आनंदीबेन गुजराती, येड्डीयुरप्पा कानडी, सुशील मोदी बिहारी मतांकरिता प्रयत्न करीत आहेत. 
भाजपाने आपल्या गुजरातमधील सर्व आमदारांना मतदानाच्या दिवशी मुंबईत राहुन गुजराती मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे फर्मान काढले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील भाजपाचे काही बाहुबली नेते मतदानाच्या दिवशी मुंबईत येतील व शिवसेनेकडून भाजपा मतदारबहुल विभागात दहशत बसवण्याचा प्रयत्न झाला तर त्यास आडकाठी करणार असल्याचे कळते. कुठल्याही परिस्थितीत साम, दाम, दंड, भेद या मार्गाचा वापर करून मुंबईत यश मिळविण्याचे भाजपाने ठरवले आहे.  भाजपाने परप्रांतीय नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने मतदानाच्या तोंडावर मुंबईत गुजराती विरुद्ध मराठी असा भाषिक वाद निर्माण होऊ शकतो आणि शिवसैनिकांकडून आक्रमक प्रतिक्रिया रस्त्यावर उमटू शकते, अशी भीती राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)