शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

ही आहेत मुंबईजवळील ट्रेकर्सची आवडती ८ ठिकाणं, तुम्ही जाऊन आलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 19:26 IST

मुंबई : मार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेल. आम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.  ही सर्व ठिकाणं मुंबई पासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.1. देवकुंड धबधबामुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर ...

ठळक मुद्देमार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेलआम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.ही सर्व ठिकाणं मुंबईपासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

मुंबई : मार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेल. आम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.  ही सर्व ठिकाणं मुंबईपासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

1. देवकुंड धबधबा

मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर असणाऱ्या कोलाड येथील भिरा गावाजवळ असलेलं देवकुंड धबधबा आहे. स्वच्छ पाणी व ट्रेकिंगसाठी सोपे असलेल्या या ठिकाणी तीन धबधब्यांचा संगम होतो व भलामोठा देवकुंड धबधबा तयार होतो.

2. विजापूरचा किल्ला

मुंबईपासून 100 किमी दूर लोणाववळ्याजवळ व माळवली स्टेशनपासून 5 किमीवर विसापूरचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये सुंदर लेणी पाहायला मिळतील. विशेषतः येथे वेगळ्या प्रकारची जुनी घरंदेखील अद्यापपर्यंत आहेत. किल्ल्याच्या टोकावर जाण्यासाठी जवळपास 1 तास लागतो पण रस्त्यात तुम्हाला पवना धबधब्याची मजाही लुटता येते. 

3. ड्युक्स नोज 

विकेन्ड अगदी मुंबईपासून जवळ तसंच शांत ठिकाणी घालवायचा असेल तर मुंबईपासून जेमतेम तीन तासांचच्या अंतरावर आहे. मुंबई ,पुणे व जवळील परिसरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगचा आनंद लुटतात. विशेष म्हणजे, ड्युक्स नोज हे येथे एक जवळच शिखर आहे तेथून पर्यटकांना खंडाळा आणि भोर घाटाच्या नैसर्गिक सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो.

4. राजमाची

लोणावळ्यातील प्रसिद्ध किल्ला म्हणजे राजमाची. सह्याद्रीच्या पर्वतरांगा व शिरोता धबधब्याचं किल्ल्यावरून दिसणारं दृश्य ट्रेकर्सना आकर्षित करतं. पावसाळ्यात व हिवाळ्यात राजमाचीला भेट नक्की द्या.

5. अलंग आणि मदन

मुंबईतील सर्वात कठीण ट्रेकिंग स्पॉट म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. या ठिकाणी कुलांग, कुलनवाडी, मदन असे तीन किल्ले असून कुलांग हा चढण्यासाठी सर्वात कठीण आहे. त्यामुळे इथे ट्रेकिंगला जाणार असाल तर तुमच्या संयम, धाडस आणि शक्तीची परीक्षाच असते. 

6. ताम्हिणी घाट 

मुळशी धबधब्याच्या जवळच असलेलं हे ठिकाण अगदी उंचावर आहे. रस्त्यावरून पाहिलं तर हा घाट अगदी प्रशस्त दिसतो. हा घाट इथे असणारी हिरवळ, व्हॅली आणि धबधब्यांमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ट्रेकिंगला येणाऱ्या प्रत्येकाला ताम्हिणी घाटाचं आकर्षण असतं.

7. कळवणी दुर्ग

प्रभळ गडाच्या शेजारीच असलेल्या हा किल्ला ट्रेकर्सच्या सर्वाधिक पसंतीचा किल्ला आहे. या गडावर पोहोचण्यासाठी पायऱ्या नसून आपल्याला स्वत:ला मार्ग तयार करावा लागतो. धाडसी ट्रेकर्संना इथे ग्रुप ट्रेकिंगचीच गरज असते.8. हरिहर किल्ला  

नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला  प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.

टॅग्स :Travelप्रवासtourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई