शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

ही आहेत मुंबईजवळील ट्रेकर्सची आवडती ८ ठिकाणं, तुम्ही जाऊन आलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 19:26 IST

मुंबई : मार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेल. आम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.  ही सर्व ठिकाणं मुंबई पासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.1. देवकुंड धबधबामुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर ...

ठळक मुद्देमार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेलआम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.ही सर्व ठिकाणं मुंबईपासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

मुंबई : मार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेल. आम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.  ही सर्व ठिकाणं मुंबईपासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

1. देवकुंड धबधबा

मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर असणाऱ्या कोलाड येथील भिरा गावाजवळ असलेलं देवकुंड धबधबा आहे. स्वच्छ पाणी व ट्रेकिंगसाठी सोपे असलेल्या या ठिकाणी तीन धबधब्यांचा संगम होतो व भलामोठा देवकुंड धबधबा तयार होतो.

2. विजापूरचा किल्ला

मुंबईपासून 100 किमी दूर लोणाववळ्याजवळ व माळवली स्टेशनपासून 5 किमीवर विसापूरचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये सुंदर लेणी पाहायला मिळतील. विशेषतः येथे वेगळ्या प्रकारची जुनी घरंदेखील अद्यापपर्यंत आहेत. किल्ल्याच्या टोकावर जाण्यासाठी जवळपास 1 तास लागतो पण रस्त्यात तुम्हाला पवना धबधब्याची मजाही लुटता येते. 

3. ड्युक्स नोज 

विकेन्ड अगदी मुंबईपासून जवळ तसंच शांत ठिकाणी घालवायचा असेल तर मुंबईपासून जेमतेम तीन तासांचच्या अंतरावर आहे. मुंबई ,पुणे व जवळील परिसरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगचा आनंद लुटतात. विशेष म्हणजे, ड्युक्स नोज हे येथे एक जवळच शिखर आहे तेथून पर्यटकांना खंडाळा आणि भोर घाटाच्या नैसर्गिक सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो.

4. राजमाची

लोणावळ्यातील प्रसिद्ध किल्ला म्हणजे राजमाची. सह्याद्रीच्या पर्वतरांगा व शिरोता धबधब्याचं किल्ल्यावरून दिसणारं दृश्य ट्रेकर्सना आकर्षित करतं. पावसाळ्यात व हिवाळ्यात राजमाचीला भेट नक्की द्या.

5. अलंग आणि मदन

मुंबईतील सर्वात कठीण ट्रेकिंग स्पॉट म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. या ठिकाणी कुलांग, कुलनवाडी, मदन असे तीन किल्ले असून कुलांग हा चढण्यासाठी सर्वात कठीण आहे. त्यामुळे इथे ट्रेकिंगला जाणार असाल तर तुमच्या संयम, धाडस आणि शक्तीची परीक्षाच असते. 

6. ताम्हिणी घाट 

मुळशी धबधब्याच्या जवळच असलेलं हे ठिकाण अगदी उंचावर आहे. रस्त्यावरून पाहिलं तर हा घाट अगदी प्रशस्त दिसतो. हा घाट इथे असणारी हिरवळ, व्हॅली आणि धबधब्यांमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ट्रेकिंगला येणाऱ्या प्रत्येकाला ताम्हिणी घाटाचं आकर्षण असतं.

7. कळवणी दुर्ग

प्रभळ गडाच्या शेजारीच असलेल्या हा किल्ला ट्रेकर्सच्या सर्वाधिक पसंतीचा किल्ला आहे. या गडावर पोहोचण्यासाठी पायऱ्या नसून आपल्याला स्वत:ला मार्ग तयार करावा लागतो. धाडसी ट्रेकर्संना इथे ग्रुप ट्रेकिंगचीच गरज असते.8. हरिहर किल्ला  

नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला  प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.

टॅग्स :Travelप्रवासtourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई