शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरेंमुळे काँग्रेसचे नुकसान!

By admin | Updated: October 12, 2014 01:17 IST

राज्यात ७0/८0 उमेदवारांना चुकीच्या पद्धतीने तिकीट; माजी आमदार बबनराव चौधरी यांचा आरोप.

अकोला : विधानसभा निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक हे पक्षाचे नुकसान करीत असल्याचा आरोप माजी आमदार बबनराव चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपाकरिता इच्छुकांपैकी प्रमुख तीन जणांचे पॅनल काँग्रेसने तयार केले होते. निवड मंडळाने निवडलेल्या या नावांमध्ये काही नेत्यांनी हस्तक्षेप करून नवीन नावे टाकली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एकाकी पाडून चुकीच्या पद्धतीने तिकिटांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी माणिकराव ठाकरे आणि मुकुल वासनिक हे दोन्ही नेते जबाबदार असल्याचा आरोप करून, त्यांना ताबडतोब पदावरून दूर करण्याची मागणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आली असल्याचे चौधरी यांनी सांगितले. बुलडाणा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात वासनिक यांची पूर्ण टीम काम करीत आहे. विरोधात काम करणार्‍यांना वासनिक हेलीकॉप्टरमधून घेऊन फिरत असल्याचा घणाघाती आरोपही चौधरी यांनी केला. अकोला महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेसचे अब्दुल जब्बार यांना पाडणार्‍या महिलेस पक्षाने उमेदवारी दिली. राज्यात महिला उमेदवारालाच उमेदवारी द्यायची होती, तर यवतमाळच्या महिला आमदारास डावलून माणिकराव ठाकरे यांनी स्वत:च्या मुलाला कशी उमेदवारी दिली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात ७0 ते ८0 तिकिटे चुकीच्या पद्धतीने कशाच्या मोबदल्यात वाटली, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही चौधरी यांनी पक्षाकडे केली आहे. बिहार आणि राजस्थानमध्ये तिकीट वाटपात वासनिक यांनी घोळ केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या अधिवेशनात झाला होता. त्याचे स्मरण करून देत चौधरी यांनी, वासनिक यांचे हस्तक अकोला व राज्यात सर्वत्र फिरून तिकीट वाटपाचे काम करतात, असा आरोप केला. बुलडाण्यात नोकरीनिमित्त गेलेल्या अकोल्यातील एका व्यक्तीला जिल्हाध्यक्षपद देऊन, ६ ते ७ वर्षांपासून स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे. हीच व्यक्ती अकोल्यात येऊन तिकीट वाटप करून जाते, असा आरोपही चौधरी यांनी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांचे नाव न घेता केला. काँग्रेसने आठ वेळा तिकीट देऊन पाच वेळा पराभूत झालेले वासनिक एकदा निवडून आले, की त्याच मतदारसंघातून पुन्हा निवडून येत नाहीत आणि अशा व्यक्तीकडे राज्याचे नेतृत्व देण्यात आले आहे. विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी यांना वगळून विदर्भावर एक प्रकारे अन्यायच केला आहे. हा अन्याय दूर करण्याची मागणी चौधरी यांनी केली. चौधरी यांच्या या आरोपांबाबत माणिकराव ठाकरे आणि मुकुल वासनिक यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही, तर वासनिक यांचा भ्रमणध्वनी प्रतिसाद देत नव्हता.