शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई वेगळी करणा-यांचे पाय छाटू - राज ठाकरे

By admin | Updated: February 2, 2017 08:55 IST

भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना हाकल्या जात आहेत. केवळ भाजपाला रोखण्यासाठी

मुंबई : भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना हाकल्या जात आहेत. केवळ भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मनसे किंवा स्वत:साठी नाहीतर तर मराठीसाठी हात पुढे केला होता. पण माझ्यासाठी आज हा विषय संपला, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणुकांना सामारे जाणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. दादर येथील शिवाजी मंदीर सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढविला. शिवसेना-मनसे युतीबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेचा संदर्भ देत राज म्हणाले की, भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात सत्ता गेली तर मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळेच शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरेंना सात वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. टाळी झिडकारली किंवा, लाथाडले अशी चर्चा आहे. पण आपण मराठी माणसासाठी कुणाचेही पाय चाटू. मात्र मुंबई मराठी माणसापासून वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर पाय छाटू , असा इशाराही त्यांनी दिला. सगळे काही आम्हालाच हवे असा हट्ट भाजपाने चालविला आहे. एकप्रकारची हुकुमशाहीच देशात पाहायला मिळते आहे. भाजपकडून केवळ आश्वासने दिली जातात. थापा या शब्दाला पयार्यी शब्द भाजपा आहे. गुगलला फेकू हा शब्द टाईप केला की मोदींचे नाव येते, जगात आपली हीच प्रतिमा आहे का, असा टोला राज यांनी लगावला. सेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्वत:कडे बघा. २५ वर्षे त्यांच्यासोबत तुम्हीपण सत्तेत होतात. दोघांनी मिळून भ्रष्टाचार केला आहे. नाशिक ही राज्यातील एकमेव महापालिका आहे, जिथे भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. पारदर्शी कारभाराच्या भाजपा-शिवसेना फक्त गप्पा मारतात, पण पारदर्शी कारभार काय असतो, ते मी नाशिकध्ये दाखवून दिले आहे, असे राज यांनी सांगितले. आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने उभे रहा. पुढचे १८ दिवस मनसैनिकांनी व्यक्ती म्हणून नाही, तर पक्ष म्हणून काम करावे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतील मराठी माणसांनी विचार करुन मतदान करावे असे आवाहन केले. (प्रतिनिधी)महापौर बंगला हडपायचा आहेदिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे केवळ निमित्त आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगल्याची जागा हडपायची आहे. त्यासाठीच शिवसेना भाजपाला सोडू शकत नाही. केंद्र आणि राज्याच्या सत्तेतून जो पैसा येतो तो सुटत नाही. त्यामुळेच शिवसेना भाजपाला चिटकून असल्याचा आरोप राज यांनी केला.