शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

मुंबई वेगळी करणा-यांचे पाय छाटू - राज ठाकरे

By admin | Updated: February 2, 2017 08:55 IST

भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना हाकल्या जात आहेत. केवळ भाजपाला रोखण्यासाठी

मुंबई : भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना हाकल्या जात आहेत. केवळ भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मनसे किंवा स्वत:साठी नाहीतर तर मराठीसाठी हात पुढे केला होता. पण माझ्यासाठी आज हा विषय संपला, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणुकांना सामारे जाणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. दादर येथील शिवाजी मंदीर सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढविला. शिवसेना-मनसे युतीबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेचा संदर्भ देत राज म्हणाले की, भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात सत्ता गेली तर मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळेच शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरेंना सात वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. टाळी झिडकारली किंवा, लाथाडले अशी चर्चा आहे. पण आपण मराठी माणसासाठी कुणाचेही पाय चाटू. मात्र मुंबई मराठी माणसापासून वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर पाय छाटू , असा इशाराही त्यांनी दिला. सगळे काही आम्हालाच हवे असा हट्ट भाजपाने चालविला आहे. एकप्रकारची हुकुमशाहीच देशात पाहायला मिळते आहे. भाजपकडून केवळ आश्वासने दिली जातात. थापा या शब्दाला पयार्यी शब्द भाजपा आहे. गुगलला फेकू हा शब्द टाईप केला की मोदींचे नाव येते, जगात आपली हीच प्रतिमा आहे का, असा टोला राज यांनी लगावला. सेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्वत:कडे बघा. २५ वर्षे त्यांच्यासोबत तुम्हीपण सत्तेत होतात. दोघांनी मिळून भ्रष्टाचार केला आहे. नाशिक ही राज्यातील एकमेव महापालिका आहे, जिथे भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. पारदर्शी कारभाराच्या भाजपा-शिवसेना फक्त गप्पा मारतात, पण पारदर्शी कारभार काय असतो, ते मी नाशिकध्ये दाखवून दिले आहे, असे राज यांनी सांगितले. आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने उभे रहा. पुढचे १८ दिवस मनसैनिकांनी व्यक्ती म्हणून नाही, तर पक्ष म्हणून काम करावे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतील मराठी माणसांनी विचार करुन मतदान करावे असे आवाहन केले. (प्रतिनिधी)महापौर बंगला हडपायचा आहेदिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे केवळ निमित्त आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगल्याची जागा हडपायची आहे. त्यासाठीच शिवसेना भाजपाला सोडू शकत नाही. केंद्र आणि राज्याच्या सत्तेतून जो पैसा येतो तो सुटत नाही. त्यामुळेच शिवसेना भाजपाला चिटकून असल्याचा आरोप राज यांनी केला.