शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis: राज्यात म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या ५ हजारांवर जाण्याची भीती; राज्य सरकारची विशेष तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 09:14 IST

सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची सलग्न रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व आयसीयू खुला करण्याची परवानगी देण्यात येईल

ठळक मुद्देया आजारावरील उपचारांना राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रात आज पंधराशेच्या आसपास रुग्ण आहे. स्वतंत्र वॉर्ड आणि आयसीयू करण्याचा निर्णय घेतला आहे

अतुल कुलकर्णी

मुंबई – येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या ५ हजार होईल असा अंदाज राज्य आरोग्य हमी सोसायटीने व्यक्त केला आहे. त्यापैकी ७५ टक्के रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करता येतील. त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या आजाराने बाधित रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार केले जातील अशी माहिती याआधीच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती.

त्यादृष्टीने राज्य आरोग्य हमी सोसायटीने पाठवलेल्या प्रस्तावाला आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. या आजारासाठी मायक्रोबायोलॉजिल्ट इंटरनल मेडिसीन तज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ तसेच दंतरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सर्जन अशा विविध सेवांची गरज असते. त्यामुळे यासाठी वेगळी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. असे राज्याच्या आरोग्य विभागाचे मत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासाठी काही निर्णय घेतले आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आणि आयसीयूची व्यवस्था करण्यात यावी अन्य रुग्णांच्या संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी या आजाराचे रुग्ण वेगळे ठेवण्यात यावेत.

सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची सलग्न रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व आयसीयू खुला करण्याची परवानगी देण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मदतीने रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालये निवडण्यासाठी पात्रतेचे निकष ठरवू दिले जातील असा निर्णयही सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

या संदर्भात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे लोकमतशी बोलताना म्हणाले की, या योजनेंतर्गंत रुग्णांवर उपचार घेण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड अथवा आयसीयूमध्ये सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये भरती होऊ शकतात. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गंत राज्य शासन दीड लाख विमा संरक्षणातून तसेच पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाख विमा संरक्षणातून खर्च देऊ शकते. या योजनेंतर्गंत येणाऱ्या रुग्णालयांना अँटिफंगल औषधे मोफत दिली जातील . ही औषधे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली तर ती कमी किंमतीतही उपलब्ध होतील.

या योजनेंतर्गंत राज्यातील सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना मोफत उपचार घेणे शक्य होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदायी योजनेत नसणाऱ्या खासगी रुग्णालयांना किती दर लावावे? त्याचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे असेही डॉ. शिंदे म्हणाले. औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी दरही नियंत्रित करण्यात येत आहेत.

उपचाराला सर्वोच्च प्राधान्य – राजेश टोपे

या आजारावरील उपचारांना राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रात आज पंधराशेच्या आसपास रुग्ण आहे. मात्र येत्या काळात रुग्ण वाढण्याची शक्यता गृहित धरून राज्य सरकार सर्व उपाययोजना करत आहे. त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड आणि आयसीयू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनदायी योजनेतील रुग्णांना मोफत उपचार केले जातील तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या