शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

Mucormycosis: राज्यात म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या ५ हजारांवर जाण्याची भीती; राज्य सरकारची विशेष तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 09:14 IST

सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची सलग्न रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व आयसीयू खुला करण्याची परवानगी देण्यात येईल

ठळक मुद्देया आजारावरील उपचारांना राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रात आज पंधराशेच्या आसपास रुग्ण आहे. स्वतंत्र वॉर्ड आणि आयसीयू करण्याचा निर्णय घेतला आहे

अतुल कुलकर्णी

मुंबई – येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या ५ हजार होईल असा अंदाज राज्य आरोग्य हमी सोसायटीने व्यक्त केला आहे. त्यापैकी ७५ टक्के रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार करता येतील. त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या आजाराने बाधित रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार केले जातील अशी माहिती याआधीच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती.

त्यादृष्टीने राज्य आरोग्य हमी सोसायटीने पाठवलेल्या प्रस्तावाला आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. या आजारासाठी मायक्रोबायोलॉजिल्ट इंटरनल मेडिसीन तज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ तसेच दंतरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सर्जन अशा विविध सेवांची गरज असते. त्यामुळे यासाठी वेगळी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. असे राज्याच्या आरोग्य विभागाचे मत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासाठी काही निर्णय घेतले आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आणि आयसीयूची व्यवस्था करण्यात यावी अन्य रुग्णांच्या संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी या आजाराचे रुग्ण वेगळे ठेवण्यात यावेत.

सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची सलग्न रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड व आयसीयू खुला करण्याची परवानगी देण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मदतीने रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालये निवडण्यासाठी पात्रतेचे निकष ठरवू दिले जातील असा निर्णयही सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

या संदर्भात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे लोकमतशी बोलताना म्हणाले की, या योजनेंतर्गंत रुग्णांवर उपचार घेण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड अथवा आयसीयूमध्ये सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये भरती होऊ शकतात. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गंत राज्य शासन दीड लाख विमा संरक्षणातून तसेच पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाख विमा संरक्षणातून खर्च देऊ शकते. या योजनेंतर्गंत येणाऱ्या रुग्णालयांना अँटिफंगल औषधे मोफत दिली जातील . ही औषधे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली तर ती कमी किंमतीतही उपलब्ध होतील.

या योजनेंतर्गंत राज्यातील सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना मोफत उपचार घेणे शक्य होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदायी योजनेत नसणाऱ्या खासगी रुग्णालयांना किती दर लावावे? त्याचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे असेही डॉ. शिंदे म्हणाले. औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी दरही नियंत्रित करण्यात येत आहेत.

उपचाराला सर्वोच्च प्राधान्य – राजेश टोपे

या आजारावरील उपचारांना राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रात आज पंधराशेच्या आसपास रुग्ण आहे. मात्र येत्या काळात रुग्ण वाढण्याची शक्यता गृहित धरून राज्य सरकार सर्व उपाययोजना करत आहे. त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड आणि आयसीयू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनदायी योजनेतील रुग्णांना मोफत उपचार केले जातील तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या