शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Mucormycosis: भय इथले संपत नाही! कोरोना पाठोपाठ राज्यावर आणखी एक संकट; टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 10:50 IST

Mucormycosis: कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रावर आणखी एक संकट; आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार

मुंबई/नवी दिल्ली: राज्यात एप्रिलच्या मध्यापासून कठोर निर्बंध लागू असल्यानं कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ३० हजारांच्या आत आला आहे. राज्यात ३१ मेपर्यंत कठोर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होऊ शकते. मात्र आता राज्यावर आणखी एक संकट आलं आहे. ब्लॅक फंगसमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच शब्द फिरवला; यू टर्नमुळे कोरोना संकट आणखी वाढण्याचा धोकादेशात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे जवळपास ५५०० रुग्ण आढळून आले. ब्लॅक फंगसमुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या लक्षात घेता, त्यापैकी ७० टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. ब्लॅक फंगसचा धोका वाढल्यानं ५ राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. ब्लॅक फंगसमुळे परिस्थिती बिघडत चालली असून या आजारासाठी वापरण्यात येणाऱ्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी औषधाची कमतरता भासू लागली आहे.कोरोनाच्या संकटात मोठा निष्काळजीपणा! देशातील 50 टक्के लोक मास्कच वापरत नाहीत; रिसर्चमधून खुलासादेशभरात ५५०० जणांना ब्लॅक फंगस आजार झाला आहे. यातील १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९० जण महाराष्ट्रातील आहेत. ब्लॅक फंगसमुळे हरयाणात १४, तर उत्तर प्रदेशात ८ जणांनी जीव गमावला आहे. उत्तर प्रदेशात ब्लॅक फंगसमुळे प्राण गमावणारे सर्व रुग्ण राजधानी लखनऊमधील आहेत. बिहारमध्ये ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसदेखील आढळून आल्यानं चिंतेत भर पडली आहे.कोणत्या राज्यात काय स्थिती?झारखंडमध्ये ब्लॅक फंगसमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन जणांचा ब्लॅक फंगसमुळे जीव गेला आहे. बिहार, आसाम, ओदिशा आणि गोव्यात प्रत्येकी एक जण दगावला आहे. काही राज्यांनी अद्याप ब्लॅक फंगसशी संबंधित माहिती गोळा केलेली नाही. त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या