शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एसटी सेवा हळूहळू मार्गावर; २ दिवसांत वाढल्या हजार गाड्या, ५० टक्के कर्मचारी रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 06:13 IST

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत.

मुंबई :

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सध्या ७ हजार गाड्या सुरू असून,  प्रवासीसंख्या १५ लाखांपर्यंत गेली आहे. एसटी हळूहळू रुळावर येत आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या संख्येने कर्मचारी रुजू होतील, अशी माहिती आहे.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. 

प्रवासीसंख्येत अडीच लाखांची वाढ पाच महिन्यांनंतर एसटीमध्ये कर्मचारी रुजू होण्याचा आकडा वाढला आहे. १३ एप्रिलपर्यंत सहा हजार गाड्या सुरू होत्या. मात्र, दोन दिवसांत त्यात एक हजारांची वाढ झाली असून, त्या सात हजार झाल्या आहेत, तर प्रवासीसंख्येत अडीच लाखांची वाढ झाली आहे. उत्पन्न पाेहाेचले दहा कोटींपार - कोरोनापूर्व काळात दररोज ६५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न २१ कोटी मिळत होते. - कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक अंशतः सुरू होती. - कर्मचारीसंख्या वाढल्यानंतर आता ७ हजार गाड्या सुरू झाल्याने उत्पन्नाचा आकडा १० कोटींच्या पार गेला आहे.४५००० कर्मचारी परतलेएसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर  मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आतापर्यंत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा ४५ हजारांपर्यंत पोहोचला आहे.न्यायालयाच्या निर्णयानंतर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या जत्रांच्या पार्श्वभूमीवर गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता ७ हजार गाड्या सुरू असून, त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.     - शेखर चन्ने,  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

टॅग्स :ST Strikeएसटी संप