शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार, पगारासाठी राज्य सरकारकडून ३०० कोटींचा निधी वितरीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 17:30 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे. कारण रखडलेला पगार अखेर मिळणार आहे.

मुंबई-

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे. कारण रखडलेला पगार अखेर मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये निधी राज्य सरकारकडून वितरीत करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारावरुन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारनं तातडीनं हे पाऊल उचललं आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून एक परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. 

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीनशे कोटी रुपये वितरीत केले आहेत. यात कर्मचाऱ्यांचा फक्त नेट पगार होईल, त्यात गॅच्युटी, पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. तसंच कर्मचाऱ्यांचा आजच पगार होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सरकारने ३०० कोटी निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आता होणार आहे. या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे.

एसटी संप काळात कर्मचाऱ्यांचे वेतन सात ते 10 तारखे दरम्यान देण्याचं आश्वासन राज्य सरकारने कोर्टात दिलं होतं. मात्र तरीही गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार होत नाही. यामध्ये याही महिन्यात १२ तारीख उलटली तरीही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त होते. एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. 

सरकारनं दिलेली रक्कम अपुरीएसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारनं ३०० कोटी रुपये दिले असले तरी दिलेली रक्कम अपुरी असल्याचं काँग्रेस प्रणित एसटी संघटनेचे म्हणणे आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत व्हावा यासाठी दरमहा ३६० कोटी रुपये देणे गरजेचे आहे. तशी हमी राज्य सरकारने कोर्टात दिली होती. तरीही दर महिन्याला सरकारकडून अपुरा निधी दिला जात आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांची थकलेली देणी १ हजार २०० कोटींच्या घरात गेली आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संप