शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे मोदींचे स्वप्न भंग: सुजय विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 12:10 IST

वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला.

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना, पिक विमा भरूनही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर याचवेळी त्यांनी पीक विमा कंपन्यांवर टीका सुद्धा केली. पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मी कोणत्याही पक्षाचा असलो तरीही माझ्यासाठी आधी शेतकरी महत्वाचा आहे. त्यामुळे वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला. पीक विमा कंपनीचा एकच प्रतिनिधी तालुकापातळीवर आहे. लोक ऑनलाइन अर्ज करतात. त्यानंतर त्यांनी भरपाई मागायची कोणाकडे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पीक विमा भरून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने गेल्या काही महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. त्यांतर आता पुन्हा शिवसेना याच मुद्यावरून आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सुद्धा विमा कंपनीच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची भूमिका सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.