शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

पीकविमा कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे मोदींचे स्वप्न भंग: सुजय विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 12:10 IST

वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला.

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना, पिक विमा भरूनही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर याचवेळी त्यांनी पीक विमा कंपन्यांवर टीका सुद्धा केली. पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मी कोणत्याही पक्षाचा असलो तरीही माझ्यासाठी आधी शेतकरी महत्वाचा आहे. त्यामुळे वेळप्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सुजय विखे यांनी दिला. पीक विमा कंपनीचा एकच प्रतिनिधी तालुकापातळीवर आहे. लोक ऑनलाइन अर्ज करतात. त्यानंतर त्यांनी भरपाई मागायची कोणाकडे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पीक विमा भरून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने गेल्या काही महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. त्यांतर आता पुन्हा शिवसेना याच मुद्यावरून आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सुद्धा विमा कंपनीच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची भूमिका सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.