शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंचा अहंकार बाहेर पडत होता, मुंबईकर जनता जागा दाखवून देईल”; राणांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 21:31 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणातून अहंकार आणि अहंकारच दिसत होता हेच सर्व जनतेने पाहिले, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गटप्रमुखांच्या नेत्यांना जाहीररित्या संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गट यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तर दिले. यानंतर शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासह भाजप नेतेही उद्धव ठाकरेंवर पलटवार करत आहेत. यातच आता अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. 

उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली ती सभा नव्हती. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आव्हान देत होते, ते आव्हान नव्हते, तर तो उद्धव ठाकरे यांचा अहंकार बाहेर पडत होता.या बरोबरच कालच्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल. मला वाटते की, एक म्हण आहे की, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात स्वत: पडतो. हीच स्थिती उद्धव ठाकरे यांची होणार आहे, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

मुंबईची जनता निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देईल

आम्हाला असे वाटले होते की कालच्या सभेत ते एक कबुली देतील. ती अशी की मी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मी विसरलेलो आहे, त्यामुळे बाळासाहेबांनी मला माफ करावे, असे ते म्हणतील असे आम्हाला वाटत होते. पण त्यांनी माफी मागितली नाही. माफी न मागता उलट त्यांचा अहंकार लोकांसमोर बाहेर पडला आहे. इतके नक्की आहे आहे की हा अहंकार पाहून मुंबईची जनता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असा दावा नवनीत राणा यांनी केला. 

दरम्यान, उद्धव ठाकरे इतरांवर टीका करतात की, हे दिल्लीमध्ये जाऊन झुकतात. मात्र, उद्धव ठाकरे हे दिल्लीत १० जनपथ येथे जाऊन त्यांनी तेथे किती लोटांगण घातले हे महाराष्ट्राची जनता जाणते. गेल्या अडीच वर्षांत जनतेने सगळे पाहिले आहे. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारून त्यांच्याकडून १० जनपथाची जी-हुजुरी सुरू होती. फक्त अहंकार आणि अहंकारच त्यांच्याकालच्या भाषणात दिसत होता आणि हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली. 

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना