शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंचा अहंकार बाहेर पडत होता, मुंबईकर जनता जागा दाखवून देईल”; राणांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 21:31 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणातून अहंकार आणि अहंकारच दिसत होता हेच सर्व जनतेने पाहिले, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गटप्रमुखांच्या नेत्यांना जाहीररित्या संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गट यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तर दिले. यानंतर शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासह भाजप नेतेही उद्धव ठाकरेंवर पलटवार करत आहेत. यातच आता अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. 

उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली ती सभा नव्हती. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आव्हान देत होते, ते आव्हान नव्हते, तर तो उद्धव ठाकरे यांचा अहंकार बाहेर पडत होता.या बरोबरच कालच्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल. मला वाटते की, एक म्हण आहे की, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात स्वत: पडतो. हीच स्थिती उद्धव ठाकरे यांची होणार आहे, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

मुंबईची जनता निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देईल

आम्हाला असे वाटले होते की कालच्या सभेत ते एक कबुली देतील. ती अशी की मी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मी विसरलेलो आहे, त्यामुळे बाळासाहेबांनी मला माफ करावे, असे ते म्हणतील असे आम्हाला वाटत होते. पण त्यांनी माफी मागितली नाही. माफी न मागता उलट त्यांचा अहंकार लोकांसमोर बाहेर पडला आहे. इतके नक्की आहे आहे की हा अहंकार पाहून मुंबईची जनता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असा दावा नवनीत राणा यांनी केला. 

दरम्यान, उद्धव ठाकरे इतरांवर टीका करतात की, हे दिल्लीमध्ये जाऊन झुकतात. मात्र, उद्धव ठाकरे हे दिल्लीत १० जनपथ येथे जाऊन त्यांनी तेथे किती लोटांगण घातले हे महाराष्ट्राची जनता जाणते. गेल्या अडीच वर्षांत जनतेने सगळे पाहिले आहे. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारून त्यांच्याकडून १० जनपथाची जी-हुजुरी सुरू होती. फक्त अहंकार आणि अहंकारच त्यांच्याकालच्या भाषणात दिसत होता आणि हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे, अशी बोचरी टीका नवनीत राणा यांनी केली. 

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना